शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पाटोद्यातील शेतकऱ्यांना यंदाही टाळणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

पाटोदा : जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळी व ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी रात्री ...

पाटोदा : जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळी व ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रोहतवाडी, बेनसूर शिवारात शेतकऱ्यांच्या १५ मेंढ्यांचा मृत्यूही झाला. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. भाजप नेत्या तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र, तालुक्याच्या बाहेरून कारभार पाहणारे कृषी व महसूल कर्मचारी हे पंचनामे करणार की, खरीप काळात घरात बसूनच नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिल्याप्रमाणेच या अवकाळीचेही तसेच होणार अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पाटोदा तालुका हा ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याहीपेक्षा डोंगराळ भूभाग व अल्पसिंचन क्षेत्रामुळे कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तालुक्याचा कारभार पाहणारे वरिष्ठ अधिकारीही तालुक्याच्या बाहेर राहूनच कारभार पाहतात. खरीप हंगामात समाधानकारक पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर ही पिके काढणीस आलेली असताना १० ते १२ दिवस झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये जाहीर करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, महसूल व कृषी विभागाला तालुक्यातील नुकसान दिसले नाही. त्यामुळे पाटोदा तालुक्यातील शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. तसेच खरीप पीकविमा भरलेले शेतकरी महसूल व कृषीच्या अहवालामुळे खरीप पीक विम्यासही मुकले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे खरिपात अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही. खरिपात अतिवृष्टीने क्षेत्र बाधित नसल्याचा कृषी व महसूल विभागाचा अहवाल आला. त्यामळे खरीप पिकांचा विमाही मिळाला नाही. आता १८ फेब्रुवारी रोजी गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तरी पंचनामे होतील काय ? याबाबत शेतकऱ्यांना शंका आहे. पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.