शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

शहरी, ग्रामीण भेदभाव का? बीडमध्ये मुलांना मिळतोय फक्त तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

इयत्ता पहिली ते आठवीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप केले जाते. कोविड-१९ ...

इयत्ता पहिली ते आठवीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप केले जाते. कोविड-१९ पासून शासनाच्या निर्देशानुसार वाटपाचे दिवस व प्रमाण देण्यात येते. तर शिक्षण विभाग अंमलबजावणी करत असते.

शाळेत पालकांना बोलावून नियोजनानुसार आहार वाटप केले जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना घरपोच आहार वाटपाच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांमार्फत आहार वाटप केले जात आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शाळा पातळीवर आहार वाटपाचे नियोजन केले जात असून जानेवारीपर्यंत आहार वाटप झाल्याचे सांगण्यात आले.

-------------

बीड पॅटर्न ठरला आदर्श

लॉकडाऊन काळात शालेय पोषण आहार वाटपाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना होत्या. स्थानिक प्रशासन व आपत्ती प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात शालेय पोषण आहार वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. हे काम उत्कृष्ट झाल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करीत बीडचा पॅटर्न अन्य जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला.

---------

बीड शहरात केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या (सेंट्रलाइज किचनशेड) ७५ शाळा आहेत. शासनाच्या सूचनेनुसार या शाळांच्या विद्यार्थ्यांना फक्त तांदूळ वाटप केले जात आहे. या शाळा वगळता अन्य सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप होत आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पुरवठा आणि वितरणाचे संनियंत्रण करण्यात येते. कुठल्याही तक्रारी नाहीत. - अजय बहीर, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जि. प. बीड.

------

भेदभाव नको

सेंट्रलाइज किचनशेड असो वा नसो सर्वच विद्यार्थ्यांना पोषण आहारात तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप व्हायला हवे. शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव शासन कशासाठी करते ? असा सवाल काही पालकांनी केला.

-----

शाळांमध्येही मापचोरी

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार प्रतिविद्यार्थी प्रमाण ठरवून दिलेले असते. मात्र बहुतांश शाळांमध्ये वाटप करताना वजनमाप न करता भांडे किंवा डब्याचा माप करून वाटप केले जाते. यात अनेकदा आहार शिल्लक राहतो. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी मापचोरी होत असून या बाबींवर नियंत्रणाची गरज आहे.

---------

शालेय पोषण आहार बीड जिल्हा

एकूण लाभार्थी ३, ३६, ४९५

ग्रामीण लाभार्थी २,५१,९६०

शहरी लाभार्थी ८४, ५३५

---------

पहिली ते पाचवी

शहरी ५०८२७

ग्रामीण १,५९, २१५

सहावी ते आठवी

शहरी ३३७०८

ग्रामीण ९२७४५

------------