शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शहरी, ग्रामीण भेदभाव का? बीडमध्ये मुलांना मिळतोय फक्त तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

इयत्ता पहिली ते आठवीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप केले जाते. कोविड-१९ ...

इयत्ता पहिली ते आठवीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप केले जाते. कोविड-१९ पासून शासनाच्या निर्देशानुसार वाटपाचे दिवस व प्रमाण देण्यात येते. तर शिक्षण विभाग अंमलबजावणी करत असते.

शाळेत पालकांना बोलावून नियोजनानुसार आहार वाटप केले जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना घरपोच आहार वाटपाच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांमार्फत आहार वाटप केले जात आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शाळा पातळीवर आहार वाटपाचे नियोजन केले जात असून जानेवारीपर्यंत आहार वाटप झाल्याचे सांगण्यात आले.

-------------

बीड पॅटर्न ठरला आदर्श

लॉकडाऊन काळात शालेय पोषण आहार वाटपाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना होत्या. स्थानिक प्रशासन व आपत्ती प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात शालेय पोषण आहार वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. हे काम उत्कृष्ट झाल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करीत बीडचा पॅटर्न अन्य जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला.

---------

बीड शहरात केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या (सेंट्रलाइज किचनशेड) ७५ शाळा आहेत. शासनाच्या सूचनेनुसार या शाळांच्या विद्यार्थ्यांना फक्त तांदूळ वाटप केले जात आहे. या शाळा वगळता अन्य सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप होत आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पुरवठा आणि वितरणाचे संनियंत्रण करण्यात येते. कुठल्याही तक्रारी नाहीत. - अजय बहीर, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जि. प. बीड.

------

भेदभाव नको

सेंट्रलाइज किचनशेड असो वा नसो सर्वच विद्यार्थ्यांना पोषण आहारात तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप व्हायला हवे. शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव शासन कशासाठी करते ? असा सवाल काही पालकांनी केला.

-----

शाळांमध्येही मापचोरी

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार प्रतिविद्यार्थी प्रमाण ठरवून दिलेले असते. मात्र बहुतांश शाळांमध्ये वाटप करताना वजनमाप न करता भांडे किंवा डब्याचा माप करून वाटप केले जाते. यात अनेकदा आहार शिल्लक राहतो. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी मापचोरी होत असून या बाबींवर नियंत्रणाची गरज आहे.

---------

शालेय पोषण आहार बीड जिल्हा

एकूण लाभार्थी ३, ३६, ४९५

ग्रामीण लाभार्थी २,५१,९६०

शहरी लाभार्थी ८४, ५३५

---------

पहिली ते पाचवी

शहरी ५०८२७

ग्रामीण १,५९, २१५

सहावी ते आठवी

शहरी ३३७०८

ग्रामीण ९२७४५

------------