शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:49 IST

निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले.

बीड : वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये, यासह निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले. बीडजवळ पालवन परिसरात गुरुवारपासून सुरू झालेल्या वृक्षसंमेलनाच्या समारोपावेळी सह्याद्री देवराई संस्थेचे धनंजय शेडबाळे यांनी या ठरावांचे वाचन केले. व्यासपीठावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

वृक्ष संमेलनात निसर्ग संवर्धनासाठी ठराव1. महाराष्ट्रातील परंपरागत जपलेल्या देवराया संरिक्षत म्हणून जाहीर करून त्यांचे संवर्धन करावे2. वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर, कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये?3. महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेनुसार जे वातावरणीय विभाग पडतात त्या भागांतील स्थानिक वृक्ष, वनस्पती यांचाच वृक्षारोपणात समावेश करावा4. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे आणि ताम्हण (जारूळ) राज्यफुल आहे. ही दोन्ही झाडे राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय परिसरात लावण्यात यावीत.5. राज्यातील सर्व गवताळ कुरणे, पाणथळ जागा, तळी यांचे     संरक्षण करावे आणि संवर्धन करावे. 6. राज्यातील सर्व शहरे, गावांत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करावे आणि सर्व सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी रोपे, झाडे लावून ते वाढवण्यासाठी वापरात आणावे. 7. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वाणाचे (जसे धान्य, वृक्ष, वनस्पती, भाज्या, कडधान्ये, गवत इत्यादी) बीजसंकलन करून त्याची सिडबँक तयार करावी व त्याचे संवर्धन करावे.8. वाढते शहरीकरण, विकास कामे, संरक्षित वनात रस्त्यांचे विस्तारीकरण, रु ंदीकरण, घाटरस्ते आदी कारणांमुळे जंगले तुटली आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. त्यांच्यासाठी हक्काचे वाइल्ड कॉरिडोर शासनाने त्वरित करावेत. 9. शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना देशी रोप देऊन ते वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे. त्या रोपांचा दरवर्षी आढावा घ्यावा. शेवटच्या वर्षी त्याला यासाठी खास गुण द्यावेत. 10. राज्यातील सध्या बहुतेक सर्व शाळांमधून परदेशी वृक्ष (गुलमोहर, अशोक, निलिगरी वगैरे) लावलेले आहेत. इथून पुढे फक्त देशी वृक्ष (उदा. बहावा, बकुळ, पारिजातक, ताम्हण वगैरे) लावावेत. 11. राज्यातील प्रत्येक तालुक्यात जैवविविधता उद्यान उभे करावे.

टॅग्स :Beedबीडenvironmentपर्यावरणsayaji shindeसयाजी शिंदे