शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

गुटगुटीतपणा गोंडस नव्हे, तर आरोग्यासाठी धोकादायक, मुलांची वेळेत काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST

अविनाश मुडेगावकर / लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागात खेड्यापाड्यांत कुपोषण वाढत असताना शहरी भागात मात्र ...

अविनाश मुडेगावकर /

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ग्रामीण भागात खेड्यापाड्यांत कुपोषण वाढत असताना शहरी भागात मात्र अतिपोषण ही समस्या निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. टीव्ही आणि मोबाइलमध्येच मुलांचा खूप वेळ जातो. दिवसभर घरी असल्याने सतत जंक फूड, चॉकलेट, थंड पेये, वेफर्स, असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, मैदानी खेळ बंद असल्याने व्यायाम थांबला आहे. त्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे.

स्थूलतेमुळे लहान वयातच मुलांमध्ये अतिरिक्त उष्मांक, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: ८ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते.

आहारातून शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. पोषक तत्त्वे कमी प्रमाणात किंवा अतिप्रमाणात मिळाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या वाढीवर होतो. त्यामुळेच मुलांमध्ये कुपोषण किंवा अतिपोषण होते.

...

स्थूलता ही नवी शहरी समस्या

शहरातील कुटुंबांमध्ये बरेचदा आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतात. आर्थिक सुबत्ता असल्याने मुलांचे सर्व हट्ट पालकांकडून पूर्ण केले जातात.

मॅगी, चिप्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, पास्ता, असे नानाविध पदार्थ हॉटेलमधून ऑर्डर करण्याची क्रेझ लॉकडाऊन काळात बरीच वाढली आहे.

..

पालेभाज्या, फळे पाहून मुले नाक मुरडतात. मुले पूर्ण वेळ घरात असल्याने त्यांचा वेळ चांगला जावा, म्हणून पालक त्यांचे खाण्या-पिण्याचे सर्व हट्ट पुरवतात. त्याची परिणती मुलांचे वजन वाढण्यात होत आहे.

...

पोषक घटक हवेत

मुलांची उंची, वय, वजन यानुसार शरीराची पोषक घटकांची गरज ठरते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते.

पदार्थांमध्ये रंग, रूप, चवीचे वैविध्य राखल्यास मुले आवडीने पौष्टिक अन्न खातात.

...