शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बेरोजगारांची संख्या वाढत असताना ८८५ ग्रामपंचायतींचा रोहयो कामांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बीड : कोरोना लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. पर्यायाने बेरोजगारीत भर पडली. पोटाची खळगी भरण्यासाठी कामांचा शोध सुरू ...

बीड : कोरोना लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. पर्यायाने बेरोजगारीत भर पडली. पोटाची खळगी भरण्यासाठी कामांचा शोध सुरू झाला. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसत आहे. मागेल त्याला काम, मागेल तेव्हा , मागेल तितके, पाहिजे तितके काम आणि कामाचे दाम अशी व्यवस्था असलेल्या रोहयो कामांना जिल्ह्यातील १,०३१ पैकी ८८५ ग्रामपंचायतींनी शून्य खर्च करत ठेंगा दाखविला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. खासगी ठिकाणी काम करणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली. त्यामुळे पर्याय म्हणून अनेक बेरोजगार काम शोधत आहेत. ग्रामीण भागात कामे शोधणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली असताना ग्रामपंचायती मात्र रोहयोच्या कामांकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. गावाच्या समृद्धीसाठी सार्वजनिक लाभाची कामे आणि लक्षाधीश होण्यासाठी वैयक्तिक लाभाची कामे अशी वर्गवारी शासनाने या योजनेत केलेली आहे. या कामाची मागणी ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांकडे करायची, कामाच्या मागणीची पोहच घ्यायची, काम मागणी केल्यावर १५ दिवसांतच गावात काम सुरू होते. कामाच्या ठिकाणी मस्टरवर रोज हजेरी, दर आठवड्याला कामाचे मोजमाप, नोंदणीनंतर मिळणाऱ्या जॉब कार्डवर केलेल्या कामाची किती मजुरी ते कळते. दर १५ दिवसांच्या आत मजुरी बँक किंवा पोस्टाच्या खात्यात जमा होते. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांनी महिन्यातून दोन वेळा रोजगार दिवस भरविण्याचे निर्देश आहेत. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध , मी समृद्ध, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध’ असा नारा देत रोजगार हमी योजनेतून समृद्ध महाराष्ट्र करण्याचे ध्येय असल्याचा सरकारकडून प्रचार केला जात आहे. असे असले तरी ग्रामपंचायतींचा कारभार हाकणाऱ्यांचे कान बंद आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना आणि या कालावधीतील नियमांचा जाच आणि मजूर मिळत नसल्याची कारणे मात्र ग्रामपंचायतींकडून सांगितली जात आहेत. मात्र जिल्ह्यातील १,०३१ पैकी ८८५ ग्रामपंचायतींनी शून्य खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तातडीने कामे सुरू करून काम मागणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणेचा पाठपुरावा सुरू झाला आहे.

----------

रोहयोवर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती -८८५

तालुकानिहाय आकडेवारी

बीड - २०५

अंबाजोगाई - ७७

आष्टी -९९

धारूर -६८

गेवराई - ७५

केज- १०९

माजलगाव -६५

परळी- ५९

पाटोदा- ३६

शिरूर - ४१

वडवणी- ५१

----------

मजुरांच्या मागणीप्रमाणे सर्व ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तिक लाभांची कामे प्राधान्याने करण्याबाबत व मोठ्या प्रमाणावर काम मागणी असेल तर सार्वजनिक कामे विशेषतः जलसंधारण व मृद संधारणाची कामे सुरू करण्याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले आहे. कामे कमी असणाऱ्या सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. एक कुटूंब,एक जॉबकार्ड व एक मजूर, एक स्वतंत्र राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते नंबर नोंद करून सर्व मजुरांना कामे मागणीप्रमाणे ग्रामपंचायतींनी उपलब्ध करून द्यावीत. -- डी. बी. गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, बीड.

------------