शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ९०० मुले गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : जिल्ह्यात दहावी प्रवेशित मुलांची संख्या पाहता ९०० ने कमी असून नववीपर्यंत फुगलेला हा आकडा दहावीत कसा कमी ...

बीड : जिल्ह्यात दहावी प्रवेशित मुलांची संख्या पाहता ९०० ने कमी असून नववीपर्यंत फुगलेला हा आकडा दहावीत कसा कमी झाला, याबद्दल विविध शंका व्यक्त होत आहेत. पटावरील आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील दिसणारी तफावत कोरोनामुळे आहे की इतर कारणांमुळे हे समजणे अवघड झाले आहे. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थी इयत्ता नववीपर्यंत येतात. मात्र, दहावीच्या निकलावर परिणाम होऊ नये म्हणून परीक्षेचे अर्ज भरताना शाळेचे शिक्षक व संस्थाचालकांकडून सावध पाऊल टाकत होते. तर अनुदानासाठी तसेच पटसंख्या टिकविण्यासाठी नववीपर्यंत विद्यार्थी संख्या वाढती दिसते. मात्र, दहावीची परीक्षा देण्यासाठी भरावा लागणारा अर्ज, द्यावे लागणाऱ्या कागदपत्रांमुळे शाळांपुढेही पेच असतो.

मात्र, सर्व संस्थांमध्ये असे होत नाही. काही संस्था प्रामाणिकपणे वस्तुस्थितीदर्शक आणि आवश्यक माहिती उपलब्ध करतात. तर अनेक शाळा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाला कळवीत नाहीत. तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडे देखील ही तफावत शोधण्याची व्यवस्था नाही. मागील वर्षीपासून शासनाने केलेल्या काही नियमांमुळे मात्र नववीपर्यंत फुगणारे आकडे कमी होत आहेत. तरीही नववीतील ९०० मुले गेले कुठे? असा प्रश्न कायम आहे.

-------

बीड जिल्ह्यात नववी वर्गातील विद्यार्थी संख्या ४९ हजार ८९० होती. तर दहावीत प्रविष्ट होणारी संख्या ४८ हजार ९८३ इतकी आहे.

------------

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर....

आई-वडिलांना मुलीचे ओझे कमी करायचे असते. त्यामुळे तिचे हात पिवळे करायची घाई असते. त्यामुळे कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करीत बालविवाह करण्याकडे काही पालकांचा ओढा असतो. मात्र, असे विवाह समाजपटलावर लक्षात येत नाहीत. तसेच शिकण्यापेक्षा मुलगी, मुलगा आपल्या हाताखाली कामाला येतील, अशी अपेक्षा पालक ठेवतात. आर्थिक अडचणींमुळे रोजगारासाठी कामे शोधतात. यासाठी स्थलांतरही करावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्येत ही तफावत आढळू शकते, असे प्रा. मुकुंद देशमुख म्हणाले.

--------

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीच्या वर्गात दाखल झालेला विद्यार्थी मधल्या काळात शाळाबाह्य झाला तरी पटावर त्याचे नाव तसेच ठेवले जाते. शाळेतील पदानुसार अनुदान मिळते. कमी पटसंख्या दाखविली तर पदे निष्कासित होण्याची भीती असते.

विद्यार्थी एकच; परंतु त्याचे नाव दोन शाळांमध्ये नोंदलेले असते. यातून पट टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. नववीपर्यंत अनेक मुले, मुली विविध कारणांमुळे शाळांपासून दूर राहिली तरी त्यांची नावे दिसतात. त्यामुळे वाढलेल्या विद्यार्थी संख्येचा आभासीपणाचा फुगा मात्र दहावीत फुटतोच.

आता शासनाच्या निर्देशानुसार पटावरील विद्यार्थी आणि त्यांचे आधार क्रमांक जाेडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेमके किती विद्यार्थी खरे, हे स्पष्ट होणार आहे.

------------

नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्येत येणाऱ्या तफावतीबद्दल विचारणा केली असता, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. तसेच मागील वर्ष कोरोना व त्याआधीचे एक वर्ष अशा दोन वर्षांपासून तपासणीच झालेली नसल्याची बाबही पुढे आली आहे. विद्यार्थी संख्या फुगविणाऱ्या शाळांची तपासणी करण्याकडे शिक्षण विभागाची उदासीनता दिसून आली आहे.

------------