शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ९०० मुले गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : जिल्ह्यात दहावी प्रवेशित मुलांची संख्या पाहता ९०० ने कमी असून नववीपर्यंत फुगलेला हा आकडा दहावीत कसा कमी ...

बीड : जिल्ह्यात दहावी प्रवेशित मुलांची संख्या पाहता ९०० ने कमी असून नववीपर्यंत फुगलेला हा आकडा दहावीत कसा कमी झाला, याबद्दल विविध शंका व्यक्त होत आहेत. पटावरील आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील दिसणारी तफावत कोरोनामुळे आहे की इतर कारणांमुळे हे समजणे अवघड झाले आहे. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थी इयत्ता नववीपर्यंत येतात. मात्र, दहावीच्या निकलावर परिणाम होऊ नये म्हणून परीक्षेचे अर्ज भरताना शाळेचे शिक्षक व संस्थाचालकांकडून सावध पाऊल टाकत होते. तर अनुदानासाठी तसेच पटसंख्या टिकविण्यासाठी नववीपर्यंत विद्यार्थी संख्या वाढती दिसते. मात्र, दहावीची परीक्षा देण्यासाठी भरावा लागणारा अर्ज, द्यावे लागणाऱ्या कागदपत्रांमुळे शाळांपुढेही पेच असतो.

मात्र, सर्व संस्थांमध्ये असे होत नाही. काही संस्था प्रामाणिकपणे वस्तुस्थितीदर्शक आणि आवश्यक माहिती उपलब्ध करतात. तर अनेक शाळा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाला कळवीत नाहीत. तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडे देखील ही तफावत शोधण्याची व्यवस्था नाही. मागील वर्षीपासून शासनाने केलेल्या काही नियमांमुळे मात्र नववीपर्यंत फुगणारे आकडे कमी होत आहेत. तरीही नववीतील ९०० मुले गेले कुठे? असा प्रश्न कायम आहे.

-------

बीड जिल्ह्यात नववी वर्गातील विद्यार्थी संख्या ४९ हजार ८९० होती. तर दहावीत प्रविष्ट होणारी संख्या ४८ हजार ९८३ इतकी आहे.

------------

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर....

आई-वडिलांना मुलीचे ओझे कमी करायचे असते. त्यामुळे तिचे हात पिवळे करायची घाई असते. त्यामुळे कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करीत बालविवाह करण्याकडे काही पालकांचा ओढा असतो. मात्र, असे विवाह समाजपटलावर लक्षात येत नाहीत. तसेच शिकण्यापेक्षा मुलगी, मुलगा आपल्या हाताखाली कामाला येतील, अशी अपेक्षा पालक ठेवतात. आर्थिक अडचणींमुळे रोजगारासाठी कामे शोधतात. यासाठी स्थलांतरही करावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्येत ही तफावत आढळू शकते, असे प्रा. मुकुंद देशमुख म्हणाले.

--------

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीच्या वर्गात दाखल झालेला विद्यार्थी मधल्या काळात शाळाबाह्य झाला तरी पटावर त्याचे नाव तसेच ठेवले जाते. शाळेतील पदानुसार अनुदान मिळते. कमी पटसंख्या दाखविली तर पदे निष्कासित होण्याची भीती असते.

विद्यार्थी एकच; परंतु त्याचे नाव दोन शाळांमध्ये नोंदलेले असते. यातून पट टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. नववीपर्यंत अनेक मुले, मुली विविध कारणांमुळे शाळांपासून दूर राहिली तरी त्यांची नावे दिसतात. त्यामुळे वाढलेल्या विद्यार्थी संख्येचा आभासीपणाचा फुगा मात्र दहावीत फुटतोच.

आता शासनाच्या निर्देशानुसार पटावरील विद्यार्थी आणि त्यांचे आधार क्रमांक जाेडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेमके किती विद्यार्थी खरे, हे स्पष्ट होणार आहे.

------------

नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्येत येणाऱ्या तफावतीबद्दल विचारणा केली असता, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. तसेच मागील वर्ष कोरोना व त्याआधीचे एक वर्ष अशा दोन वर्षांपासून तपासणीच झालेली नसल्याची बाबही पुढे आली आहे. विद्यार्थी संख्या फुगविणाऱ्या शाळांची तपासणी करण्याकडे शिक्षण विभागाची उदासीनता दिसून आली आहे.

------------