शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कधी उघडणार मंदिराचे दरवाजे ? ४ महिन्यांपासून मंदिराच्या पायरीचेच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:44 IST

वेळेनुसार भाविकांची पाऊले वळताहेत मंदिराकडे

शिरुर कासार : सर्व जगाला त्रासून सोडलेल्या कोरोनाने देवादिकांना सुध्दा बंदिस्त करून ठेवले आहे. सतत भाविकांची वर्दळ असलेली श्रध्दास्थाने, मंदिराचे दरवाजे गत चार महिन्यां पासून बंद असल्याने नित्याने सकाळ - संध्याकाळ दर्शनाला जाणारे भाविक मंदिराच्या पायरीचेच दर्शन घेत असल्याचे चित्र दिसून येते. कधी उघडणार मंदिराचे दरवाजे ? याकडे सर्व भक्तांचे लक्ष लागले आहे. 

शहरातील सिध्देश्वर व कालिका देवी म्हणजे शिव शक्तिचे पीठ समजले जाते. शहराबरोबरच इथे पंचक्रोशीतील लोक जसा वेळ मिळेल तसे दर्शनाला  येत असतात. मात्र, ही मंदिर बंद असली तरी भाविकांचे पाऊल  आपोआप वेळेला मंदिराकडे वळल्याशिवाय राहत नाही. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणावर अंकुश ठेवणे क्रमप्राप्त झाल्याने शेकडो वर्षाच्या परंपरा मोडीत निघाल्या. नियमांच्या अधिन राहून औपचारिकता पूर्ण केली जात आहे. बाजार, जत्रा, यात्रा, नारळी, मोठमोठे सप्ताह याशिवाय लग्न समारंभ, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर बंधन लादली गेली. त्याचबरोबर मोठी तीर्थक्षेत्र, तिथे चालणाऱ्या उपक्रमात लाखो भाविकांना उपस्थिती वर्ज झाली. त्याचप्रमाणे हाच नियम गावोगावच्या मठ मंदिरांना देखील लागू असल्याने याचे दरवाजे पटापट बंद झाले. लवकरच ही महामारी आटोक्यात येईल आणि पूर्ववत सर्व सुरू होईल असे वाटत होते. मात्र, तसे न घडता कोरोना पाश घट्ट आवळला जात असल्याने मंदिराचे दरवाजे बंद झाले. शिवाय घंटानाद, टाळ मृदंग देखील मुके झाले.

हळूहळू व्यापार क्षेत्र सुरू झाले. नियमांच्या अधीन राहत लग्नाच्या अक्षदा पडू लागल्या, प्रवासही सुरू झाला. याशिवाय मदिराचे ग्लास रिकामे होऊन मद्यपींचा आत्मा शांत केला जात आहे. मात्र, मंदिराचे टाळे कायम ठेवल्याने भाविक खंत व्यक्त करीत आहेत. कधी उघडणार मंदिराचे दरवाजे? याकडे आशाळभूत नजरा लागलेल्या आहेत. हजारो भाविक दर्शनासाठी जाऊन कोरोनाला बळ मिळू शकते मात्र लहान मंदिरे नियम पालन करण्याचे बंधन टाकून सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याच्या भावना  भक्तांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या जात आहेत.

महिलांचे पायरीवरच हळदी कुंकूमंदिर बंद असले तरी सध्या मात्र भाविक ठरलेल्या वेळेनुसार व सोयीनुसार भाविक मंदिराच्या पायरीचेच दर्शन घेत आहेत. महिला भाविक देखील पायरीलाच हळद कुंकू वाहत आपला भाव समर्पित करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचे हे संकट दूर व्हावे व पूर्ववत मठ, मंदिर, गडांना  व प्रार्थना स्थळाला भाविकांचा बहर यावा असी प्रतिक्रिया सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी व्यक्त केली. कोरोना पराभूत करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, आपण सुरक्षित राहून आपल्या भावना जतन कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड