शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

कोरोना असल्यामुळे काय झालं? गॅप का घ्यायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही पाठ सोडत नाही. कोरोनामुळे या वर्षी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये काही महिने सुरू होती. ...

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही पाठ सोडत नाही. कोरोनामुळे या वर्षी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये काही महिने सुरू होती. मात्र शिक्षणाची लिंक लागली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे आव्हान होते. मात्र ऑनलाइन आणि स्वयं अध्ययनामुळे विद्यार्थ्यांनी होईल तेवढ्या अभ्यासाच्या बळावर परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. वर्ष कशामुळे वाया घालवायचे, अशा विचारातून गॅप न घेता परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत घट अथवा वाढ न होता, गतवर्षी मागील वर्गात प्रविष्ट मुले यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत. गतवर्षी ऐन परीक्षेच्या अंतिम टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला होता. दहावीच्या परीक्षेत ४३,१०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४२,७८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकाल ९१.२४ टक्के लागला. तर बारावीसाठी ३९,१५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३८,८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकाल ८८.८३ टक्के लागला.

चालू वर्षात मात्र शाळा जूनऐवजी नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. त्यातही उपस्थितीचे प्रमाण कमीच राहिले. मात्र सुरुवातीपासून ऑनलाइन अभ्यास बहुतांश मुलांना करता आला. त्यामुळे परीक्षा देण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

---------

शाळांकडून समुपदेशनामुळे टळला गॅप

बहुतांश मुलांना विविध कारणांमुळे ऑनलाइन अभ्यास करता आला नाही, ही प्रणाली प्रभावी ठरली नाही. अनेक मुलांनी घरी अभ्यास केला नाही, शाळा नाही, अन शिकवणी नसल्याने आपल्या पाल्याने गॅप घ्यावा, असे पालकांना वाटत होते. मात्र हे प्रमाण एक ते दोन टक्के होते. अशा पालकांना कोरोनामुळे शासनाकडून सवलत दिली जाईल, संधी मिळेल, ती कशाला हुकवता, मुलांचे वय वाढते, त्यांचे आत्मबल खचू देऊ नका अशा रीतीने समजावून सांगून समुपदेशन केल्याने पालकांनी ऐकले. त्यामुळे गॅप घेणाऱ्यांची संख्या नसल्यातच जमा असल्याचे द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिगांबर अंकुशे यांनी सांगितले. तर गॅपसाठी इच्छुक पालकांना समजावून तसेच आग्रह करून त्यांच्या पाल्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतल्याचे संस्कार विद्यालयाचे सहशिक्षक विनायक जोशी यांनी सांगितले.

संधी आली चालून

मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरच्या परीक्षा दिल्या. यात ते उत्तीर्ण झाले. त्यांना नियमानुसार अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. तर काहींनी इतरत्र जेथे प्रवेश सुरू होते, तेथे प्रयत्न करून पुढच्या शिक्षणाचा प्रवास सुरू केला. काही मुलांना तर तंत्रनिकेतनला प्रवेश मिळाला, असा अनुभव प्रथमच आला आहे. मागील वर्षी नापासांचे प्रमाणही अत्यंत कमी होते. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींची संख्या फारशी नसणार आहे.

दहावीचे परीक्षार्थी

२०२०- ४२७८८

२०२१ - ४३९८५

बारावीचे परीक्षार्थी

२०२० - ३८८८६

२०२१- ४१२००