शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

बीडमध्ये बांधकाम मंत्र्यांचे ‘दणक्या’त स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:25 IST

बेजबाबदार कारभाराचे आगार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बुधवारी चंपावतीनगरीत ‘दणक्या’त स्वागत केले. दिवसभर त्यांचा प्रवास खड्ड्यातूनच झाला.

ठळक मुद्देसा.बां.चा बेजबाबदार कारभार अधिका-यांकडून बैठकीत घेतला आढावा

बीड : बेजबाबदार कारभाराचे आगार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बुधवारी चंपावतीनगरीत ‘दणक्या’त स्वागत केले. दिवसभर त्यांचा प्रवास खड्ड्यातूनच झाला. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी दोन दिवसांपासून बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली. परंतु गैरकारभारावर पडदा टाकण्यात त्यांना अपयश आले. अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली.

जिल्ह्यात छोट्या-मोठ्या रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या सर्वच ठिकाणी मोठमोठी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून सर्वसामान्य वाहनधारक रोज प्रवास करतात. हे खड्डे चुकवितांना अनेक अपघात झालेले आहेत. यामुळे अनेक लोकांचे प्राणही गेले आहेत.

लातूर जिल्ह्यातील अपघातही हा खड्डे चुकवितानाच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असेच अपघात बीड जिल्ह्यातील रस्त्यांवर झाले. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ आहे. केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम त्यांच्याकडून केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

विश्रामगृह केले चकाचकबीडमधील शासकीय विश्रामगृह बांधकाम मंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आले होते.मंगळवारीच विश्रमागृहाच्या इमारती, झाडांना रंगरंगोटी करण्याबरोबरच परिसरातील स्वच्छता करण्यात आली.याआधी अनेक दिवसांपासून येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत होते.

खड्डे बुजविण्याचे काम निकृष्टबीड-परळी राज्य रस्त्यावर बुधवारी ठिकठिकाणी थातुरमातूर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसून आले. कारण सकाळी बुजविलेले खड्डे दुपारी उखडले होते. हा प्रकार दिंद्रुडजवळ दिसून आला. या कामाची चौकशी करुन कारवाईची मागणी होत आहे.

पितळ उघडे पडण्याची अधिका-यांना भीतीमंत्री पाटील यांचा शासकीय दौरा निश्चित होताच बांधकाम विभागाकडून ते ज्या मार्गांवरून येणार आहेत, त्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले जात होते.हा घाट केवळ आपल्या गैरकारभाराचे पितळ बांधकाम मंत्र्यांसमोर उघडे पडू नये, यासाठीच केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. जबाबदार अधिकारी, कर्मचा-यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.