शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मिळाला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

नितीन कांबळे कडा : दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची, तिथे शेतीला पाणी आणायचे ...

नितीन कांबळे

कडा : दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची, तिथे शेतीला पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न कायम समोर असल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. फळबाग शेती व हंगामी पिके घेताना पाण्याची चिंता भेडसावत होती; पण कृषी विभागाच्या योग्य सल्ल्याने तालुक्यातील २२९१ शेतकऱ्यांनी शेततळी खोदली.

शाश्वत शेती करण्यासाठी शेततळ्यांचा मार्ग काढल्याने आता शेतकरी यामुळे अडचणीतून थोड्याफार प्रमाणात का होईना बाहेर पडताना दिसत आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी शेतीला किंवा फळबागेला पाणी नसल्याने हंगामी पिकाला महत्त्व देऊन शेती करायचे; पण कृषी विभागाने वेळोवेळी जनजागृती करून विविध योजनांच्या माध्यमातून शेततळी खोदून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. मागील पाच वर्षांत तालुक्यातील २२९१ एवढी शेततळी शेतकऱ्यांनी खोदून पाणी टंचाईवर मात करून पाच हजार एकर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्या आहेत.

एरवी पाण्याअभावी फळबागा जळून जायच्या; पण आता पाण्याअभावी फळबागांना कसलीच भीती राहिली नाही. शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मार्ग मिळाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेततळे उभारले. आज त्यामुळे कसलीच पाणी टंचाई भासत नसल्याचे व शेतीला पाणी भरपूर देता येत असल्याचे मातावळी येथील शेतकरी रामदास बांगर यांनी लोकमतला सांगितले.

भविष्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी खोदून पाण्याचा साठा करून शेतशिवार बहरण्यासाठी पुढे यायला हवे. त्याचबरोबर पावसाळी हंगामातील पाण्याने शेततळी भरून घ्यायला हवीत. कृषी विभागाचे वेळोवेळी सहकार्य आहेच, काही अडचण भासल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन देखील आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

या योजनेतून खोदलेली शेततळी

सामूहिक शेततळी- ४७५,

अस्तिकरणसहित शेततळी- ३८,

फक्त अस्तिकरण शेततळी-४१,

फक्त खोदकाम केलेली शेततळी- ४७६,

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळी-१२६१.

===Photopath===

100421\20210410_102332_14.jpg