शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मिळाला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

नितीन कांबळे कडा : दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची, तिथे शेतीला पाणी आणायचे ...

नितीन कांबळे

कडा : दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची, तिथे शेतीला पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न कायम समोर असल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. फळबाग शेती व हंगामी पिके घेताना पाण्याची चिंता भेडसावत होती; पण कृषी विभागाच्या योग्य सल्ल्याने तालुक्यातील २२९१ शेतकऱ्यांनी शेततळी खोदली.

शाश्वत शेती करण्यासाठी शेततळ्यांचा मार्ग काढल्याने आता शेतकरी यामुळे अडचणीतून थोड्याफार प्रमाणात का होईना बाहेर पडताना दिसत आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी शेतीला किंवा फळबागेला पाणी नसल्याने हंगामी पिकाला महत्त्व देऊन शेती करायचे; पण कृषी विभागाने वेळोवेळी जनजागृती करून विविध योजनांच्या माध्यमातून शेततळी खोदून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. मागील पाच वर्षांत तालुक्यातील २२९१ एवढी शेततळी शेतकऱ्यांनी खोदून पाणी टंचाईवर मात करून पाच हजार एकर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्या आहेत.

एरवी पाण्याअभावी फळबागा जळून जायच्या; पण आता पाण्याअभावी फळबागांना कसलीच भीती राहिली नाही. शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मार्ग मिळाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेततळे उभारले. आज त्यामुळे कसलीच पाणी टंचाई भासत नसल्याचे व शेतीला पाणी भरपूर देता येत असल्याचे मातावळी येथील शेतकरी रामदास बांगर यांनी लोकमतला सांगितले.

भविष्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी खोदून पाण्याचा साठा करून शेतशिवार बहरण्यासाठी पुढे यायला हवे. त्याचबरोबर पावसाळी हंगामातील पाण्याने शेततळी भरून घ्यायला हवीत. कृषी विभागाचे वेळोवेळी सहकार्य आहेच, काही अडचण भासल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन देखील आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

या योजनेतून खोदलेली शेततळी

सामूहिक शेततळी- ४७५,

अस्तिकरणसहित शेततळी- ३८,

फक्त अस्तिकरण शेततळी-४१,

फक्त खोदकाम केलेली शेततळी- ४७६,

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळी-१२६१.

===Photopath===

100421\20210410_102332_14.jpg