शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार घोटाळा; आरोपी अजूनही मोकाटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:39 IST

परळी, अंबाजोगाई तालुक्यात जवळपास आठ कोटी रुपयांचा जलयुक्त घोटाळा झाला होता. त्यानंतर १३८ संस्था व कृषी विभागातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : अटकेचे आदेश, तरीही कारवाई नाही

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी, अंबाजोगाई तालुक्यात जवळपास आठ कोटी रुपयांचा जलयुक्त घोटाळा झाला होता. त्यानंतर १३८ संस्था व कृषी विभागातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांना अटक करुन कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र एकाही अधिकारी, कर्मचाºयाला अजून अटक करण्यात आलेली नाही.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती कायमची दूर व्हावी या व्यापक दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले होते. मात्र परळी व अंबाजोगाई तालुक्यात या योजनेमध्ये काम करणारे कंत्राटदार व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी मिळून कामे न करताच बोगस बिले उचलली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सर्व संस्थांवर व २४ अधिकाºयांवर गुन्हे दाखल केले आहेत.तसेच या १३८ भ्रष्ट संस्थांना शासकीय कामे न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या प्रकरणात दोषी असणाºया २४ अधिकाºयांना अटक करण्याचे देखील आदेश आहेत. मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणात कंत्राटदार व इतर अधिकारी यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी बड्या राजकीय नेत्यांचा देखील दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर या गैरप्रकाराची दखल घेतली जात नसून दबावामुळे साधी स्थळपाहणी व कृषी विभागातील अधिकारी व प्राथमिक स्तरावर कर्मचाºयांची चौकशी देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा सर्व गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. या संदर्भात परळीचे पोनि यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लवकरच आरोपींना अटक केले जाईल.विधानभवानात प्रश्नच उपस्थित केला नाहीबीड जिल्ह्यातील हा घोटाळा जवळापास १८ कोटी रुपयांचा असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले होते. मात्र एवढा मोठा घोटाळा असताना देखील जिल्ह्यातील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व पालकमंत्री पंकजा मुंडेंसह इतर आमदारांनी याविषयी विधान भवनात प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे देखील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे.प्रशासन पातळीवर कारवाई धिम्या गतीनेपरळी तालुक्यातील जलयुक्त शिवार घोटाळा हा राज्यात पहिल्यांदा उघड झाला होता. त्यानंतर ज्या गतीने चैकशी व कारवाई होणे अपेक्षित होते त्या गतीने मात्र प्रशासकीय पतळीवर चौकशी झाली नाही. त्यामुळे कारवाई झाली. प्रलंबित प्रकरणी शासन स्तरावरुन चौकशी करावी व भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.पोलिसांवर दबाव का अर्थपूर्ण व्यवहार ?अटक करण्याचे आदेश निघून ६ महिन्यांच्यावर कालावधी झाला, मात्र असे असताना देखील आरोपी व भ्रष्ट अधिकाºयांना अटक का केली जात नाही. अटक होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे.तसेच या अधिकाºयांना अटक करण्यात येऊ नये यासाठी पोलीस व तक्रारदारांसोबत देखील अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपिंना अटक करण्यात येत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारfraudधोकेबाजी