शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार घोटाळा; आरोपी अजूनही मोकाटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:39 IST

परळी, अंबाजोगाई तालुक्यात जवळपास आठ कोटी रुपयांचा जलयुक्त घोटाळा झाला होता. त्यानंतर १३८ संस्था व कृषी विभागातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : अटकेचे आदेश, तरीही कारवाई नाही

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी, अंबाजोगाई तालुक्यात जवळपास आठ कोटी रुपयांचा जलयुक्त घोटाळा झाला होता. त्यानंतर १३८ संस्था व कृषी विभागातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांना अटक करुन कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र एकाही अधिकारी, कर्मचाºयाला अजून अटक करण्यात आलेली नाही.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती कायमची दूर व्हावी या व्यापक दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले होते. मात्र परळी व अंबाजोगाई तालुक्यात या योजनेमध्ये काम करणारे कंत्राटदार व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी मिळून कामे न करताच बोगस बिले उचलली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सर्व संस्थांवर व २४ अधिकाºयांवर गुन्हे दाखल केले आहेत.तसेच या १३८ भ्रष्ट संस्थांना शासकीय कामे न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या प्रकरणात दोषी असणाºया २४ अधिकाºयांना अटक करण्याचे देखील आदेश आहेत. मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणात कंत्राटदार व इतर अधिकारी यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी बड्या राजकीय नेत्यांचा देखील दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर या गैरप्रकाराची दखल घेतली जात नसून दबावामुळे साधी स्थळपाहणी व कृषी विभागातील अधिकारी व प्राथमिक स्तरावर कर्मचाºयांची चौकशी देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा सर्व गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येतोय का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. या संदर्भात परळीचे पोनि यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लवकरच आरोपींना अटक केले जाईल.विधानभवानात प्रश्नच उपस्थित केला नाहीबीड जिल्ह्यातील हा घोटाळा जवळापास १८ कोटी रुपयांचा असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले होते. मात्र एवढा मोठा घोटाळा असताना देखील जिल्ह्यातील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व पालकमंत्री पंकजा मुंडेंसह इतर आमदारांनी याविषयी विधान भवनात प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे देखील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे.प्रशासन पातळीवर कारवाई धिम्या गतीनेपरळी तालुक्यातील जलयुक्त शिवार घोटाळा हा राज्यात पहिल्यांदा उघड झाला होता. त्यानंतर ज्या गतीने चैकशी व कारवाई होणे अपेक्षित होते त्या गतीने मात्र प्रशासकीय पतळीवर चौकशी झाली नाही. त्यामुळे कारवाई झाली. प्रलंबित प्रकरणी शासन स्तरावरुन चौकशी करावी व भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.पोलिसांवर दबाव का अर्थपूर्ण व्यवहार ?अटक करण्याचे आदेश निघून ६ महिन्यांच्यावर कालावधी झाला, मात्र असे असताना देखील आरोपी व भ्रष्ट अधिकाºयांना अटक का केली जात नाही. अटक होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे.तसेच या अधिकाºयांना अटक करण्यात येऊ नये यासाठी पोलीस व तक्रारदारांसोबत देखील अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपिंना अटक करण्यात येत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारfraudधोकेबाजी