शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

अयोध्यानगरात पाण्याचा ठणठणाट; नागरिकांमधून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

बीड : शहरातील एमआयडीसी भागाकडील आयोध्यानगरात १० ते १५ दिवसांतून एक वेळ नळाला पाणी येते. सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडे वारंवार ...

बीड : शहरातील एमआयडीसी भागाकडील आयोध्यानगरात १० ते १५ दिवसांतून एक वेळ नळाला पाणी येते. सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडे वारंवार मागणी करण्यात आली; परंतु यावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील रहिवाशांमधून पालिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.

शहरात सध्या सर्वत्र पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. नव्याने होत असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. तर जुनी पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरेसे आणि गतीने पाणी पोहोचत नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव आणि पालीच्या धरणात मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजन नसल्याने शहरवासीयांच्या घशाला कोरड पडत आहे. त्यामुळे आजही शहरातील काही भागात ८ दिवसांनंतर तर आयोध्यानगरासारख्या भागात १५ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. येथील रहिवाशांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. याबाबत पालिकेला वारंवार माहिती दिली, परंतु, यावर कसलीच कारवाई करण्यात न आल्याने आजही येथील रहिवाशांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

अध्यक्ष, नगरसेवकांचे दुर्लक्ष

निवडणूक असली की दिवसात चार चार चकरा मारणारे नेते आता नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या भागात पाणीटंचाई असतानाही आणि कल्पना देऊनही नगराध्यक्ष अथवा नगरसेवकांनी ही समस्या मार्गी लावलेली नाही. टाकीचे काम पूर्ण होईपर्यंत टँकर अथवा इतर मार्गाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते, परंतु तसे काहीच झाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोट

अयोध्यानगर भाग नुकताच पालिकेच्या हद्दीत आला आहे. या भागासाठी स्वतंत्र जलकुंभ तयार केला जात आहे. साधारण तीन ते चार महिन्यात कुंभाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर येथेही सुरळीत पाणीपुरवठा होईल.

राहुल टाळके, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प. बीड