शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

अयोध्यानगरात पाण्याचा ठणठणाट; नागरिकांमधून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

बीड : शहरातील एमआयडीसी भागाकडील आयोध्यानगरात १० ते १५ दिवसांतून एक वेळ नळाला पाणी येते. सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडे वारंवार ...

बीड : शहरातील एमआयडीसी भागाकडील आयोध्यानगरात १० ते १५ दिवसांतून एक वेळ नळाला पाणी येते. सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत पालिकेकडे वारंवार मागणी करण्यात आली; परंतु यावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील रहिवाशांमधून पालिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.

शहरात सध्या सर्वत्र पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. नव्याने होत असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. तर जुनी पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरेसे आणि गतीने पाणी पोहोचत नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव आणि पालीच्या धरणात मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजन नसल्याने शहरवासीयांच्या घशाला कोरड पडत आहे. त्यामुळे आजही शहरातील काही भागात ८ दिवसांनंतर तर आयोध्यानगरासारख्या भागात १५ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. येथील रहिवाशांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. याबाबत पालिकेला वारंवार माहिती दिली, परंतु, यावर कसलीच कारवाई करण्यात न आल्याने आजही येथील रहिवाशांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

अध्यक्ष, नगरसेवकांचे दुर्लक्ष

निवडणूक असली की दिवसात चार चार चकरा मारणारे नेते आता नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या भागात पाणीटंचाई असतानाही आणि कल्पना देऊनही नगराध्यक्ष अथवा नगरसेवकांनी ही समस्या मार्गी लावलेली नाही. टाकीचे काम पूर्ण होईपर्यंत टँकर अथवा इतर मार्गाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते, परंतु तसे काहीच झाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोट

अयोध्यानगर भाग नुकताच पालिकेच्या हद्दीत आला आहे. या भागासाठी स्वतंत्र जलकुंभ तयार केला जात आहे. साधारण तीन ते चार महिन्यात कुंभाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर येथेही सुरळीत पाणीपुरवठा होईल.

राहुल टाळके, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प. बीड