शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पुढील तारखेस हजर रहा नसता वाॅरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

राजेश राजगुरू तलवाडा : चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.आशिष शिंदे व ॲड.योगेश बोबडे यांच्यामार्फत ...

राजेश राजगुरू

तलवाडा : चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.आशिष शिंदे व ॲड.योगेश बोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर केंद्र सरकार व राज्य सरकारसह विमा कंपनीस नोटीस बजावून ११ ऑगस्टला बाजू मांडण्यास सांगितले होते. या सुनावणीसाठी विमा कंपनीचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने, राज्य व केंद्र सरकारलाही बाजू मांडता आली नाही. त्यामुळे विमा कंपनीस पुढच्या तारखेस हजर राहा, अन्यथा वाॅरंट बजावले जाईल, अशी तंबी न्या.एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या.एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने दिली.

मागील वर्षी जून ते ऑक्टोबर, २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग या पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान झाले होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शासन निर्णयानुसार पिकांचा विमा काढला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीस भरपाई द्यावी लागते, म्हणून विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. त्यांनाच भरपाई देण्याचा पवित्रा घेतला. प्रत्यक्षात मात्र, सर्वच महसूल मंडळात नुकसान झाले होते व त्या प्रकारचे महसूल विभागाने पंचनामे करून शासन स्तरावर कळविले. त्यानंतर, शासनानेही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून वाटप केले. हे अनुदान हे तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळाला जाहीर केले, तसेच चकलांबा महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, त्यांना विमा रक्कमही मिळाली, परंतु त्याच महसूल मंडळातील उर्वरित शेतकरी विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले, म्हणून चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.शिंदे व ॲड.बोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

पुढील सुनावणी

माननीय उच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकारसह विमा कंपनीस हजर राहून बाजू मांडण्यास सांगितले होते. कालच्या तारखेस केंद्र, राज्य सरकारची बाजू मांडण्यास त्यांचे प्रतिनिधी आले, पण कंपनीचा कोणताही प्रतिनिधी हजर नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता न्यायालयाने कंपनीस हजर राहा, अन्यथा कोर्ट वाॅरंट जारी करण्यात येईल, असे बजावून अंतिम निकालासाठी नोटीस बजावली आहे. पुढील तारीख १२ सप्टेंबरला ठेवली आहे.

- ॲड.योगेश बोबडे, शेतकऱ्यांचे वकील, उच्च न्यायालय, औरंगाबाद.