शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पुढील तारखेस हजर रहा नसता वाॅरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

राजेश राजगुरू तलवाडा : चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.आशिष शिंदे व ॲड.योगेश बोबडे यांच्यामार्फत ...

राजेश राजगुरू

तलवाडा : चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.आशिष शिंदे व ॲड.योगेश बोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर केंद्र सरकार व राज्य सरकारसह विमा कंपनीस नोटीस बजावून ११ ऑगस्टला बाजू मांडण्यास सांगितले होते. या सुनावणीसाठी विमा कंपनीचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने, राज्य व केंद्र सरकारलाही बाजू मांडता आली नाही. त्यामुळे विमा कंपनीस पुढच्या तारखेस हजर राहा, अन्यथा वाॅरंट बजावले जाईल, अशी तंबी न्या.एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या.एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने दिली.

मागील वर्षी जून ते ऑक्टोबर, २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग या पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान झाले होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शासन निर्णयानुसार पिकांचा विमा काढला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीस भरपाई द्यावी लागते, म्हणून विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. त्यांनाच भरपाई देण्याचा पवित्रा घेतला. प्रत्यक्षात मात्र, सर्वच महसूल मंडळात नुकसान झाले होते व त्या प्रकारचे महसूल विभागाने पंचनामे करून शासन स्तरावर कळविले. त्यानंतर, शासनानेही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून वाटप केले. हे अनुदान हे तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळाला जाहीर केले, तसेच चकलांबा महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, त्यांना विमा रक्कमही मिळाली, परंतु त्याच महसूल मंडळातील उर्वरित शेतकरी विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले, म्हणून चकलांबा येथील सतीश केशवराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी ॲड.शिंदे व ॲड.बोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

पुढील सुनावणी

माननीय उच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकारसह विमा कंपनीस हजर राहून बाजू मांडण्यास सांगितले होते. कालच्या तारखेस केंद्र, राज्य सरकारची बाजू मांडण्यास त्यांचे प्रतिनिधी आले, पण कंपनीचा कोणताही प्रतिनिधी हजर नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता न्यायालयाने कंपनीस हजर राहा, अन्यथा कोर्ट वाॅरंट जारी करण्यात येईल, असे बजावून अंतिम निकालासाठी नोटीस बजावली आहे. पुढील तारीख १२ सप्टेंबरला ठेवली आहे.

- ॲड.योगेश बोबडे, शेतकऱ्यांचे वकील, उच्च न्यायालय, औरंगाबाद.