शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्य निर्माण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:16 IST

सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ते अंबाजोगाईत आयोजित कीर्तन महोत्सवात बोलत होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाने पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता झाली. यावेळी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या महाप्रसादाने झाली.यावेळी सातारकर महाराज म्हणाले, संत तुकोबारायांनी ‘योगिया मुनी जनार्दन’ या अभंगातून वारकरी सांप्रदायाला व भक्तजनांसाठी जीवन जगण्याचा सुंदर संदेश सरळ, सोप्या भाषेत दिला. वृत्तीमध्ये लिनता असली की, जगाला तो माणूस आवडू लागतो, त्यामुळे भेदाभेद पाळू नका, सर्वांना समान माना, आई-वडीलांची सेवा करा, गुरूंचा आदर करा, जबाबदारी ओळखा चांगला माणूस म्हणून जगा असे आवाहन त्यांनी केले.आज नव्या पिढीला माता पिता नकोत पण, त्यांचा पैसा हवा आहे. कुटुंबात संवाद ठेवा, कारण, जुळवून घेणाऱ्याचाच संसार टिकतो, घरातच नव्हे तर समाजातही ऐक्य हवे, असे सातारकर महाराज म्हणाले. महोत्सवात चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवती यांचे कीर्तने झाली. तत्पूर्वी महोत्सवाच्या चौथ्या व आदल्या दिवशी चिन्मय महाराज यांचे कीर्तन झाले.प्रारंभी आयोजक बबनराव आपेट व परिवाराच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मुकुंदराज संस्थानाचे पवार महाराज व शिंदे महाराज, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सभापती मधुकर काचगुंडे, राम कुलकर्णी, मेघराज आपेट, विठ्ठलराव आपेट, प्रभु मारूती आपेट, रंजना बाभुळगावकर, उत्तमराव बावणे, दत्तात्रय जाधव, गिरी महाराज, जनार्दन मुंडे, प्रकाश आपेट, दिनकर आपेट, धनंजय कापसे, नागनाथ तोडकरसह गिरवलीचे सर्व ग्रामस्थ, महिला, वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम