शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पायी दिंडी चुकल्याची वारकऱ्यांना हुरहूर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोरोनामुळे यंदाही पायी ...

शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोरोनामुळे यंदाही पायी वारी होत नसल्याच्या असह्य वेदना सहन नाही होत नाहीत, अशा नि:शब्द भावना वारकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही वारी चुकली जात असल्याने वारकऱ्याची वळकटीदेखील अडगळीला पडली आहे.

अवघ्या जगाचे लक्ष बनून राहिलेला ज्ञानोबा, तुकोबांचा पालखी सोहळा आता अवघ्या चार दिवसांवर आला असल्याने वारकऱ्यांना वारीचे डोहाळे लागले आहेत. परंतु कोरोना महामारीमुळे यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाने पायी वारीवर निर्बंध घातले गेले. मोजक्याच उपस्थितीत आणि तेदेखील एसटीने पालखी सोहळा औपचारिकता पूर्ण करणार आहे. लाखो भाविकांसमवेत टाळ-मृदंग आणि अभंग म्हणत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कुठल्याही निमंत्रणाशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंदलहरीची अनुभूती वारकरी घेत असतो. एकदा का पायी वारी झाली की स्वत:ला कृतकृत्य झाल्याचा भाव प्रगट होत असतो. .... दोन वर्षांपासून वारी चुकली मी चार वेळेस या सोहळ्यात पायी गेलो. मध्यंतरी एक, दोन वर्षे जाता आले नाही. यावर्षी नक्की जायचे ठरवले होते. परंतु कोरोना आडवा आल्याची भावना सचिन भांडेकर व ऋषी दगडे यांनी व्यक्त केली. .. आनंदाला पारखे झाल्याची खंत जीवनातील अत्युच्च आनंदाची अनुभूती आणि ते ठिकाण म्हणजे माऊलीसोबत केलेली पायी वारी होय. साक्षात पांडुरंग परमात्मा भेटीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. असा सच्चिदानंद जगात कुठेही मिळत नाही. वारीत गेल्यावरच मिळतो. तो आनंद मी अनेक वर्षे अनुभवला. मात्र या आनंदाला आता पारखे झाल्याचे दुःख आहे. पुढील वर्षी तरी हे दुःख आम्हाला देऊ नको, ही विठ्ठलचरणी प्रार्थना. -दत्तातय परदेशी, सेवानिवृत्त शिक्षक. ... सेवेला पारखे माझ्या वडिलांनंतर मी पालखी सोहळ्यातील संत महादेव कासार दिंडीची व्यवस्था जबाबदारी सांभाळत आहे. चारशे वारकऱ्यांचे एक कुटुंब या वारीच्या कालावधीत जे समाधान देते ते शब्दात सांगता येत नाही. परंतु दोन वर्षे झाले या सेवेला आम्ही पारखे झालो, असे दिंडी चालक गिरीश अंभोरे यानी सांगितले. ... निर्बंधामुळे दिंडी नाही शासन निर्बंधांमुळे पालखी सोहळ्यात जाता येत नाही. ही त्या विठ्ठलाचीच इच्छा समजून पुढच्या वर्षी तरी आमचा असा अव्हेर करू नको, अशी प्रार्थना ज्ञानोबा, तुकोबांच्या माध्यमातून विठ्ठलाकडे करतो, असे नारायण महाराज डिसले यांनी सांगितले.