शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पायी दिंडी चुकल्याची वारकऱ्यांना हुरहूर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोरोनामुळे यंदाही पायी ...

शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोरोनामुळे यंदाही पायी वारी होत नसल्याच्या असह्य वेदना सहन नाही होत नाहीत, अशा नि:शब्द भावना वारकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही वारी चुकली जात असल्याने वारकऱ्याची वळकटीदेखील अडगळीला पडली आहे.

अवघ्या जगाचे लक्ष बनून राहिलेला ज्ञानोबा, तुकोबांचा पालखी सोहळा आता अवघ्या चार दिवसांवर आला असल्याने वारकऱ्यांना वारीचे डोहाळे लागले आहेत. परंतु कोरोना महामारीमुळे यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाने पायी वारीवर निर्बंध घातले गेले. मोजक्याच उपस्थितीत आणि तेदेखील एसटीने पालखी सोहळा औपचारिकता पूर्ण करणार आहे. लाखो भाविकांसमवेत टाळ-मृदंग आणि अभंग म्हणत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कुठल्याही निमंत्रणाशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंदलहरीची अनुभूती वारकरी घेत असतो. एकदा का पायी वारी झाली की स्वत:ला कृतकृत्य झाल्याचा भाव प्रगट होत असतो. .... दोन वर्षांपासून वारी चुकली मी चार वेळेस या सोहळ्यात पायी गेलो. मध्यंतरी एक, दोन वर्षे जाता आले नाही. यावर्षी नक्की जायचे ठरवले होते. परंतु कोरोना आडवा आल्याची भावना सचिन भांडेकर व ऋषी दगडे यांनी व्यक्त केली. .. आनंदाला पारखे झाल्याची खंत जीवनातील अत्युच्च आनंदाची अनुभूती आणि ते ठिकाण म्हणजे माऊलीसोबत केलेली पायी वारी होय. साक्षात पांडुरंग परमात्मा भेटीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. असा सच्चिदानंद जगात कुठेही मिळत नाही. वारीत गेल्यावरच मिळतो. तो आनंद मी अनेक वर्षे अनुभवला. मात्र या आनंदाला आता पारखे झाल्याचे दुःख आहे. पुढील वर्षी तरी हे दुःख आम्हाला देऊ नको, ही विठ्ठलचरणी प्रार्थना. -दत्तातय परदेशी, सेवानिवृत्त शिक्षक. ... सेवेला पारखे माझ्या वडिलांनंतर मी पालखी सोहळ्यातील संत महादेव कासार दिंडीची व्यवस्था जबाबदारी सांभाळत आहे. चारशे वारकऱ्यांचे एक कुटुंब या वारीच्या कालावधीत जे समाधान देते ते शब्दात सांगता येत नाही. परंतु दोन वर्षे झाले या सेवेला आम्ही पारखे झालो, असे दिंडी चालक गिरीश अंभोरे यानी सांगितले. ... निर्बंधामुळे दिंडी नाही शासन निर्बंधांमुळे पालखी सोहळ्यात जाता येत नाही. ही त्या विठ्ठलाचीच इच्छा समजून पुढच्या वर्षी तरी आमचा असा अव्हेर करू नको, अशी प्रार्थना ज्ञानोबा, तुकोबांच्या माध्यमातून विठ्ठलाकडे करतो, असे नारायण महाराज डिसले यांनी सांगितले.