शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांत वाढली मुलांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना विविध आजारांनी घेरले आहे. सर्दी, ताप, ...

बीड : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना विविध आजारांनी घेरले आहे. सर्दी, ताप, खोकला यांसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसत आहे. चिकुनगुनियाही डोके वर काढू पाहत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयासह खासगीमध्ये आजारी मुलांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले. तसेच जीवितहानीही होत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. या पावसामुळे हवेत गारवा आहे. तसेच अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. या बदलामुळेच लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला असे आजार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या १२ वर्षांपर्यंतच्या मुलांची गर्दी वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी मुलांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही केले. जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. शंकर काशीद, डॉ. सूरज बांगर, डॉ. अबरार हाश्मी, डॉ. दीपाली नरवडे हे आलेल्या मुलांवर उपचार करीत आहेत.

--

ओपीडीत रोज ५० रुग्ण

जिल्हा रुग्णालयात सध्या सर्दी, ताप, खोकला असलेले जवळपास ५० रुग्ण रोज येत आहेत. यातील गंभीर असणाऱ्यांना वॉर्डात पाठवून ॲडमिट करून घेतले जात आहे. त्यांच्यावर परिचारिकांमार्फत लक्ष ठेवले जाते. तसेच डॉक्टरांकडूनही राउंड घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या वॉर्डात २५ रुग्ण दाखल असल्याचे समजते.

--

डेंग्यूच्या 'साथी'ला चिकुनगुनिया

अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ वाढली आहे. सरकारीसह खाजगी रुग्णालयात मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या लोकांना डेंग्यूने ग्रासल्याचे उदाहरणे पाहावयास मिळत आहे. असे असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यातच आता डेंग्यूच्या साथीला चिकनगुनियाही आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

--

सध्या रुग्णसंख्या वाढली आहे. रोज ५०पेक्षा जास्त मुले सर्दी, ताप, खोकला झाल्याने उपचारासाठी येतात. तसेच डेंग्यूचीही साथ आहे. पालकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. तसेच थोडीही लक्षणे जाणवताच मुलांना तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांकडे दाखवावे.

डॉ. शंकर काशीद, बालरोगतज्ज्ञ, बीड

--

रोज ओपीडीतील रुग्ण ५०

ॲडमिट असलेले रुग्ण २५