शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

मोबाइल बंद करून बाधित रुग्णांचा गावभर फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:32 IST

कडा : मार्चपासून आष्टी तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सव्वाशेच्या घरात आकडेवारी गेली, तर ...

कडा : मार्चपासून आष्टी तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सव्वाशेच्या घरात आकडेवारी गेली, तर साडेसातशे रुग्ण बाधित झाले असताना काही बाधित रुग्ण मोबाइल बंद करून गावभर फेरफटका मारत असल्याने धोका वाढला आहे. आरोग्य विभाग, पोलिसांकडून समज दिली असली तरी स्थानिक पातळीवर काम करत असलेली ग्रामसुरक्षा समिती करतेय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा रुग्णावर संसर्ग फैलावत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

आष्टी तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून, नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने हा धोका वाढत चालला आहे. तालुक्यात साडेसातशे बाधित रुग्ण उपचार घेत असून, सध्या आरोग्य यंत्रणेकडे रुग्णांसाठी जागा उपलब्ध नसल्याने पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची हालचाल सुरू असतानाच आणखी काही बाधित रुग्ण आलेले आहेत. ते चुकीचा मोबाइल नंबर, चुकीचा पत्ता, बंद नंबर देऊन मोकळे होतात. ज्यांचे मोबाइल सुरू आहेत असे रुग्ण मोबाइल बंद करून गावभर फेरफटका मारत असल्याने याचा मोठ्या प्रमाणावर धोका वाढत चालला आहे. मोबाइल बंद ठेवून कडा कारखाना, जळगाव, केळसांगवी, मुर्शदपूर येथील रुग्ण गावभर फिरत असल्याने आरोग्य विभाग, पोलिसांकडून त्याच्या घरी जाऊन समज दिली असली तरी यावर गावपातळीवर नजर ठेवण्यासाठी नेमलेली ग्रामसुरक्षा समितीचे दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण होणार आहे.

अशा लोकांवर संसर्ग फैलावत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.

याबाबत आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोना चाचणी घेताना नाव, पत्ता, मोबाइल नंबर चुकीचे दिले जातात. जे बाधित निघतात ते मोबाइल बंद करून फिरतात यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच याची माहिती प्रशासनाला देऊन कारवाई करण्यासाठी ग्रामसुरक्षा समिती असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.