शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

गाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:15 IST

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ 

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील राजापूरचा वारसा अमूल्य ठेवा; पण काळजी नाही इथे आहे अहिल्याबाई होळकरांच्या काळातील मंदिर 

- राजेश राजगुरु  

तलवाडा (जि. बीड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गापासून २५ कि.मी.अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले गाव राजापुर. तसं पूरग्रस्त म्हणून ओळखलं जाणारं हे गाव पुराच्या अनेक धक्क्यातून शाबित असलेल्या या गावाला देवदेवतांची भरभरु न कृपा लाभलेली आहे.

गावात गोदातीरावर राजेश्वर व रामेश्वर अशी महादेवाची दोन मंदिरे असून हेमाडपंथी बांधकामाचा अप्रतिम नमुना असलेली ही मंदिरे अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली असल्याचे सांगण्यात येते. त्यातील एक मंदिर शंकर महादेवाच्या शिवलिंगासह  गोदातीरावर दगडांच्या सुंदर घाटावर बांधलेले आहे. रामेश्वर नावाने ओळखले जाणारे हे मंदिर काशीतील रामेश्वरानंतर दुसरे आहे असे समजले जाते. गोदाकाठावर विस्तीर्ण व मजबूत घाट, त्यावर मंदिर असा अप्रतिम बांधकामाचा नमुना आहे. 

दुसरे ग्रामदैवत असणारे महादेवाचे राजेश्वराचे हेमाडपंथी असे भव्य व अप्रतिम असे मंदिर आहे.  या मंदिरातील शिवलिंगाचे नाव ‘राजेश्वर’ असून त्यावरु नच गावाचे नाव राजापूर पडले अशी आख्यायिका आहे. राजेश्वर हे ग्रामदैवत असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच या गावात गोदातिरी काकूमाता म्हणून देवस्थान असून दरवर्षी हजारो लोक नवस फेडण्यासाठी येथे येतात. गोदाकाठावर वसलेल्या या गावात प्रवेश करतेवेळीच हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान करिमअलीशाह बाबाचे दर्शन होते. या दर्ग्यात अमावस्या पोर्णिमेला भक्त दर्शनास येतात तर मोहर्रम सणाला येथे ऊरु स असतो. यात कव्वालीसह इतर कार्यक्रमांना हजारो भाविक उपस्थित असतात. या गावात पैठण, मंजरथप्रमाणेच दशक्रि या विधीसाठी दूरवरु न दररोज लोक हजेरी लावतात. पण या लोकांसांठी ना पाण्याची सोय आहे ना निवाऱ्याची. घाटावर बसुनच दहावा करायचा, तिथेच भोजन. ऊन, वारा, पावसात या लोकांची तारांबळ ऊडते.

अमूल्य ठेवा; पण काळजी नाहीगोदावर बांधलेला हा घाट वास्तुकलेसह मजबूत बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे. पाण्याचे मोठमोठे धक्के बसूनही हा घाट मजबुतीने उभा आहे, पण या घाटावर धुण्यासाठी अवजड वाहने लावणे बाजूने अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या घाटाला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच मंदिरेही पुरातन काळापासून पाण्याचे धक्के खात असून, मोठ्या धिराने उभे असून त्यांची काळजी घेत पुरातून वास्तू जपणे गरजेचे आहे.

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ गावात दोन शंकराची मंदिरे, जागृत काकूमाता, हनुमान मंदिर, गणपती मंदिर व गोदातीर असल्याने महाशिवरात्र, मोहर्रम, उरूस व नवस फेडण्यासाठी व धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यासह पिण्याचे पाणी, निवारा नसल्याने अडचणी येतात.

टॅग्स :tourismपर्यटनBeedबीडcultureसांस्कृतिक