शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:15 IST

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ 

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील राजापूरचा वारसा अमूल्य ठेवा; पण काळजी नाही इथे आहे अहिल्याबाई होळकरांच्या काळातील मंदिर 

- राजेश राजगुरु  

तलवाडा (जि. बीड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गापासून २५ कि.मी.अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले गाव राजापुर. तसं पूरग्रस्त म्हणून ओळखलं जाणारं हे गाव पुराच्या अनेक धक्क्यातून शाबित असलेल्या या गावाला देवदेवतांची भरभरु न कृपा लाभलेली आहे.

गावात गोदातीरावर राजेश्वर व रामेश्वर अशी महादेवाची दोन मंदिरे असून हेमाडपंथी बांधकामाचा अप्रतिम नमुना असलेली ही मंदिरे अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली असल्याचे सांगण्यात येते. त्यातील एक मंदिर शंकर महादेवाच्या शिवलिंगासह  गोदातीरावर दगडांच्या सुंदर घाटावर बांधलेले आहे. रामेश्वर नावाने ओळखले जाणारे हे मंदिर काशीतील रामेश्वरानंतर दुसरे आहे असे समजले जाते. गोदाकाठावर विस्तीर्ण व मजबूत घाट, त्यावर मंदिर असा अप्रतिम बांधकामाचा नमुना आहे. 

दुसरे ग्रामदैवत असणारे महादेवाचे राजेश्वराचे हेमाडपंथी असे भव्य व अप्रतिम असे मंदिर आहे.  या मंदिरातील शिवलिंगाचे नाव ‘राजेश्वर’ असून त्यावरु नच गावाचे नाव राजापूर पडले अशी आख्यायिका आहे. राजेश्वर हे ग्रामदैवत असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच या गावात गोदातिरी काकूमाता म्हणून देवस्थान असून दरवर्षी हजारो लोक नवस फेडण्यासाठी येथे येतात. गोदाकाठावर वसलेल्या या गावात प्रवेश करतेवेळीच हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान करिमअलीशाह बाबाचे दर्शन होते. या दर्ग्यात अमावस्या पोर्णिमेला भक्त दर्शनास येतात तर मोहर्रम सणाला येथे ऊरु स असतो. यात कव्वालीसह इतर कार्यक्रमांना हजारो भाविक उपस्थित असतात. या गावात पैठण, मंजरथप्रमाणेच दशक्रि या विधीसाठी दूरवरु न दररोज लोक हजेरी लावतात. पण या लोकांसांठी ना पाण्याची सोय आहे ना निवाऱ्याची. घाटावर बसुनच दहावा करायचा, तिथेच भोजन. ऊन, वारा, पावसात या लोकांची तारांबळ ऊडते.

अमूल्य ठेवा; पण काळजी नाहीगोदावर बांधलेला हा घाट वास्तुकलेसह मजबूत बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे. पाण्याचे मोठमोठे धक्के बसूनही हा घाट मजबुतीने उभा आहे, पण या घाटावर धुण्यासाठी अवजड वाहने लावणे बाजूने अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या घाटाला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच मंदिरेही पुरातन काळापासून पाण्याचे धक्के खात असून, मोठ्या धिराने उभे असून त्यांची काळजी घेत पुरातून वास्तू जपणे गरजेचे आहे.

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ गावात दोन शंकराची मंदिरे, जागृत काकूमाता, हनुमान मंदिर, गणपती मंदिर व गोदातीर असल्याने महाशिवरात्र, मोहर्रम, उरूस व नवस फेडण्यासाठी व धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यासह पिण्याचे पाणी, निवारा नसल्याने अडचणी येतात.

टॅग्स :tourismपर्यटनBeedबीडcultureसांस्कृतिक