शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

माणसातील नैराश्याचा विशाल घेतोय शोध; सायकलवर भारत भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य ...

अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य व उदासिनतेचे योग्य मूळ शोधता आलेले नाही. याच्या मुळाशी जाऊन उदासिनता शोधण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील एक युवक सहा महिन्यांपूर्वी सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाला आहे. दोन दिवसांपूर्वी कटोल तालुक्यातील (जि. नागपूर) विशाल मनोज टेकाडे हा अंबाजोगाई शहरात पोहोचला. येथील मानवलोक संस्थेत मुक्काम करून त्याने विविध क्षेत्रातील लोकांची भेट घेतली. अगदी रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांशीही त्याने चर्चा केली.

ज्याला प्रश्न पडत नाहीत तो माणूस कसला? बीबीएचा पदवीधर असलेल्या विशाललाही एके दिवशी हा प्रश्न पडला. कुठल्याही लहान-सहान नकारात्मक गोष्टीवर माणूस उदास होतो. विशालच्या म्हणण्यानुसार देशातील ५० टक्के माणसे उदासिन आहेत. ही उदासिनता का आहे, याचा शोध प्रत्येक राज्यात जाऊन फिरल्याशिवाय घेता येणार नाही. त्यामुळे त्याने भारत भ्रमण करण्याचे ठरवले. दुचाकीवर जायचे म्हटले तर खर्च येतो, मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा विचार करुन सायकलवरुनच भारत भ्रमण करण्याचे ठरवले. दिनांक ६ जूनपासून त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

राज्यातील विविध भागात फिरत तीन दिवसांपूर्वी (२४ डिसेंबर रोजी) तो अंबाजोगाईत आला. यावेळी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्याशी त्याची भेट झाली. त्यामुळे तिथेच राहून शहर परिसर व मानवलोक संस्थेचे उपक्रम त्याने पाहिले. तिथे चालणारे कामही त्याने जाणून घेतले. यातूनच त्याची व सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे यांची भेट झाली.

जिद्द व चिकाटी असलेला तरुण

विशाल २१ वर्षांचा आहे. आई-वडिलांचा विरोध असतानाही आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे मूळ शोधण्यासाठी तो भ्रमंती करत आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुभवलेले प्रसंगही त्याने सांगितले. पोलिसांनी कुठेही अडवले नाही. परंतु, काही गावांमध्ये प्रवास करण्यास मज्जाव झाल्याने, रात्रीही प्रवास करावा लागला.

शेतकऱ्यांचे जीवनमान अनुभवले

या प्रवासात विशालने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे जीवनही अनुभवले. नव्हे तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही घेतला. जनावरांना चारा कापून टाकणे यासह इतर कामेही केल्याने शेतकऱ्यांची मानसिकता व त्यांच्या परिस्थितीची जाणीव त्याला झाली.

अहंकार व स्वार्थ

या १९८ दिवसांच्या प्रवासात त्याला नैराश्याच्या दोन बाबी लक्षात आल्या. प्रामुख्याने निसर्ग नियमानुसार आपण स्वत:ला स्वीकारले नसल्याची जाणीव झाली. अहंकार व स्वार्थ ही दोन कारणेही त्याला जाणवली. माणूस शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी असला, तरी मानसिकदृष्ट्या परावलंबी होत चालला आहे. माणूस अहंकारप्रिय होत चालल्याने अश्रू आणि हसू हे स्वत:चे राहिलेले नाहीत, असे तो सांगतो. अंबाजोगाईनंतर तो लातूरमार्गे कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू असा प्रवास करणार आहे.