शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माणसातील नैराश्याचा विशाल घेतोय शोध; सायकलवर भारत भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य ...

अंबाजोगाई : देशात प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या गोष्टीसाठी धडपडतो आहे. शिक्षणातून माणूस कितीही संशोधक बनला असला, तरी त्याला नैराश्य व उदासिनतेचे योग्य मूळ शोधता आलेले नाही. याच्या मुळाशी जाऊन उदासिनता शोधण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील एक युवक सहा महिन्यांपूर्वी सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाला आहे. दोन दिवसांपूर्वी कटोल तालुक्यातील (जि. नागपूर) विशाल मनोज टेकाडे हा अंबाजोगाई शहरात पोहोचला. येथील मानवलोक संस्थेत मुक्काम करून त्याने विविध क्षेत्रातील लोकांची भेट घेतली. अगदी रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांशीही त्याने चर्चा केली.

ज्याला प्रश्न पडत नाहीत तो माणूस कसला? बीबीएचा पदवीधर असलेल्या विशाललाही एके दिवशी हा प्रश्न पडला. कुठल्याही लहान-सहान नकारात्मक गोष्टीवर माणूस उदास होतो. विशालच्या म्हणण्यानुसार देशातील ५० टक्के माणसे उदासिन आहेत. ही उदासिनता का आहे, याचा शोध प्रत्येक राज्यात जाऊन फिरल्याशिवाय घेता येणार नाही. त्यामुळे त्याने भारत भ्रमण करण्याचे ठरवले. दुचाकीवर जायचे म्हटले तर खर्च येतो, मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा विचार करुन सायकलवरुनच भारत भ्रमण करण्याचे ठरवले. दिनांक ६ जूनपासून त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

राज्यातील विविध भागात फिरत तीन दिवसांपूर्वी (२४ डिसेंबर रोजी) तो अंबाजोगाईत आला. यावेळी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्याशी त्याची भेट झाली. त्यामुळे तिथेच राहून शहर परिसर व मानवलोक संस्थेचे उपक्रम त्याने पाहिले. तिथे चालणारे कामही त्याने जाणून घेतले. यातूनच त्याची व सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे यांची भेट झाली.

जिद्द व चिकाटी असलेला तरुण

विशाल २१ वर्षांचा आहे. आई-वडिलांचा विरोध असतानाही आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे मूळ शोधण्यासाठी तो भ्रमंती करत आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीत अनुभवलेले प्रसंगही त्याने सांगितले. पोलिसांनी कुठेही अडवले नाही. परंतु, काही गावांमध्ये प्रवास करण्यास मज्जाव झाल्याने, रात्रीही प्रवास करावा लागला.

शेतकऱ्यांचे जीवनमान अनुभवले

या प्रवासात विशालने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे जीवनही अनुभवले. नव्हे तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही घेतला. जनावरांना चारा कापून टाकणे यासह इतर कामेही केल्याने शेतकऱ्यांची मानसिकता व त्यांच्या परिस्थितीची जाणीव त्याला झाली.

अहंकार व स्वार्थ

या १९८ दिवसांच्या प्रवासात त्याला नैराश्याच्या दोन बाबी लक्षात आल्या. प्रामुख्याने निसर्ग नियमानुसार आपण स्वत:ला स्वीकारले नसल्याची जाणीव झाली. अहंकार व स्वार्थ ही दोन कारणेही त्याला जाणवली. माणूस शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी असला, तरी मानसिकदृष्ट्या परावलंबी होत चालला आहे. माणूस अहंकारप्रिय होत चालल्याने अश्रू आणि हसू हे स्वत:चे राहिलेले नाहीत, असे तो सांगतो. अंबाजोगाईनंतर तो लातूरमार्गे कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू असा प्रवास करणार आहे.