शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

अवकाळी, गारपिटीने शेतकऱ्यांची थट्टा मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची ...

तलवाडा

: गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.

खरीप अतिवृष्टीने गेल्यानंतर रब्बीवर मदार असलेला शेतकरी रब्बीची पिकेही हातची गेल्याने सुन्न झाला आहे.

२० मार्च रोजी दुपारी प्रचंड गारपीट,पाऊस व वादळवाऱ्यामुळे ऐन काढणीस आलेले हरभरा,गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळली आहेत. तर फळबागांचेही नुकसान झालेले आहे. खरिपाच्या नुकसानीतून सावरण्याआधीच शेतकरी पुन्हा कोलमडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदत मिळणे गरजेचे आहे.

पंचनाम्याचा फार्स नको मदत हवी

गारपीट व प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याची पाहणी स्थानिक सत्ताधारी, विरोधक तसेच लोकप्रतिनिधींनी केली. मात्र अजूनही अधिकृतपणे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत देऊन तत्काळ दिलासा द्यावा. पंचनामे, दौरे या भानगडीत वेळ घालवू नये अशी मागणी होत आहे.

पिकांचे मातेरे, फळांचा सडा

गहू,हरभरा,ज्वारीची माती तर फळझाडांखाली फळांचा सडा

प्रचंड व टपोऱ्या गारा, वेगवान वारे व पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी,गहू ,हरभरा ही पिके मातीत मिसळली आहेत तर फळझाडांच्या खाली फुले,कळ्या व छोट्या फळांचा सडा पडला आहे.

ऑनलाइन चक्रात अडकलाय विमा

खरीप अतिवृष्टीने व रब्बी हंगाम अवकाळी पाऊस व गारपिटीने मातीत गेला. त्यामुळे ऑनलाइन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा देण्याची भूमिका विमा कंपनीने घेतल्याने त्या किचकट प्रक्रियेमुळे साधा मोबाईल वापरणारे तर सोडा पण ॲन्ड्रॉइड मोबाईलवाले अनेक शेतकरी तक्रारीचा पावती नंबर,ओटीपी,जिओ टॅगचे छायाचित्र जोडताना चक्रावत आहेत.

अस्मानी संकट

टरबूज,खरबूज,भाजीपाल्यांचे तर कुत्रे हाल खाईनात. गहू,हरभरा,ज्वारी या पारंपरिक पिकांपेक्षा टरबूज,खरबूज अशा पिकांना अनेकपट खर्च लागतो. जवळपास एकरी लाखाच्या घरात खर्च असतो. तो खर्च करुन उत्पन्न हाती येण्यावेळीच अस्मानी संकटाने दगा दिल्यामुळे या शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहेत.

===Photopath===

250321\25bed_3_25032021_14.jpg

===Caption===

 गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापुर परिसरांत सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.