शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

अवकाळी, गारपिटीने शेतकऱ्यांची थट्टा मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची ...

तलवाडा

: गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.

खरीप अतिवृष्टीने गेल्यानंतर रब्बीवर मदार असलेला शेतकरी रब्बीची पिकेही हातची गेल्याने सुन्न झाला आहे.

२० मार्च रोजी दुपारी प्रचंड गारपीट,पाऊस व वादळवाऱ्यामुळे ऐन काढणीस आलेले हरभरा,गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळली आहेत. तर फळबागांचेही नुकसान झालेले आहे. खरिपाच्या नुकसानीतून सावरण्याआधीच शेतकरी पुन्हा कोलमडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदत मिळणे गरजेचे आहे.

पंचनाम्याचा फार्स नको मदत हवी

गारपीट व प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याची पाहणी स्थानिक सत्ताधारी, विरोधक तसेच लोकप्रतिनिधींनी केली. मात्र अजूनही अधिकृतपणे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत देऊन तत्काळ दिलासा द्यावा. पंचनामे, दौरे या भानगडीत वेळ घालवू नये अशी मागणी होत आहे.

पिकांचे मातेरे, फळांचा सडा

गहू,हरभरा,ज्वारीची माती तर फळझाडांखाली फळांचा सडा

प्रचंड व टपोऱ्या गारा, वेगवान वारे व पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी,गहू ,हरभरा ही पिके मातीत मिसळली आहेत तर फळझाडांच्या खाली फुले,कळ्या व छोट्या फळांचा सडा पडला आहे.

ऑनलाइन चक्रात अडकलाय विमा

खरीप अतिवृष्टीने व रब्बी हंगाम अवकाळी पाऊस व गारपिटीने मातीत गेला. त्यामुळे ऑनलाइन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा देण्याची भूमिका विमा कंपनीने घेतल्याने त्या किचकट प्रक्रियेमुळे साधा मोबाईल वापरणारे तर सोडा पण ॲन्ड्रॉइड मोबाईलवाले अनेक शेतकरी तक्रारीचा पावती नंबर,ओटीपी,जिओ टॅगचे छायाचित्र जोडताना चक्रावत आहेत.

अस्मानी संकट

टरबूज,खरबूज,भाजीपाल्यांचे तर कुत्रे हाल खाईनात. गहू,हरभरा,ज्वारी या पारंपरिक पिकांपेक्षा टरबूज,खरबूज अशा पिकांना अनेकपट खर्च लागतो. जवळपास एकरी लाखाच्या घरात खर्च असतो. तो खर्च करुन उत्पन्न हाती येण्यावेळीच अस्मानी संकटाने दगा दिल्यामुळे या शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहेत.

===Photopath===

250321\25bed_3_25032021_14.jpg

===Caption===

 गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापुर परिसरांत सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.