शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी, गारपिटीने शेतकऱ्यांची थट्टा मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची ...

तलवाडा

: गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.

खरीप अतिवृष्टीने गेल्यानंतर रब्बीवर मदार असलेला शेतकरी रब्बीची पिकेही हातची गेल्याने सुन्न झाला आहे.

२० मार्च रोजी दुपारी प्रचंड गारपीट,पाऊस व वादळवाऱ्यामुळे ऐन काढणीस आलेले हरभरा,गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळली आहेत. तर फळबागांचेही नुकसान झालेले आहे. खरिपाच्या नुकसानीतून सावरण्याआधीच शेतकरी पुन्हा कोलमडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदत मिळणे गरजेचे आहे.

पंचनाम्याचा फार्स नको मदत हवी

गारपीट व प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याची पाहणी स्थानिक सत्ताधारी, विरोधक तसेच लोकप्रतिनिधींनी केली. मात्र अजूनही अधिकृतपणे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत देऊन तत्काळ दिलासा द्यावा. पंचनामे, दौरे या भानगडीत वेळ घालवू नये अशी मागणी होत आहे.

पिकांचे मातेरे, फळांचा सडा

गहू,हरभरा,ज्वारीची माती तर फळझाडांखाली फळांचा सडा

प्रचंड व टपोऱ्या गारा, वेगवान वारे व पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी,गहू ,हरभरा ही पिके मातीत मिसळली आहेत तर फळझाडांच्या खाली फुले,कळ्या व छोट्या फळांचा सडा पडला आहे.

ऑनलाइन चक्रात अडकलाय विमा

खरीप अतिवृष्टीने व रब्बी हंगाम अवकाळी पाऊस व गारपिटीने मातीत गेला. त्यामुळे ऑनलाइन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा देण्याची भूमिका विमा कंपनीने घेतल्याने त्या किचकट प्रक्रियेमुळे साधा मोबाईल वापरणारे तर सोडा पण ॲन्ड्रॉइड मोबाईलवाले अनेक शेतकरी तक्रारीचा पावती नंबर,ओटीपी,जिओ टॅगचे छायाचित्र जोडताना चक्रावत आहेत.

अस्मानी संकट

टरबूज,खरबूज,भाजीपाल्यांचे तर कुत्रे हाल खाईनात. गहू,हरभरा,ज्वारी या पारंपरिक पिकांपेक्षा टरबूज,खरबूज अशा पिकांना अनेकपट खर्च लागतो. जवळपास एकरी लाखाच्या घरात खर्च असतो. तो खर्च करुन उत्पन्न हाती येण्यावेळीच अस्मानी संकटाने दगा दिल्यामुळे या शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहेत.

===Photopath===

250321\25bed_3_25032021_14.jpg

===Caption===

 गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापुर परिसरांत सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.