शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

धारूर : तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली ...

धारूर

: तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे तेलगाव व परिसरातील हजारो हेक्टर जमीन पूर्ववत ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपळी येथील कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी लोनवळ, तेलगाव, नित्रुड आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला कॅनालव्दारे येत होते. मात्र, कॅनाॅलमध्ये पाणी येण्यापूर्वी लोनवळ तलावात पाणी यायचे. हा तलाव भरल्यानंतर तेथून पुढे कालव्यातून तेलगाव, लोनवळ, नित्रुड येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. मात्र, तलाव भरण्यासाठी पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. तोपर्यंत पाणी पाळी संपते. त्यामुळे कॅनालमध्ये पाणी येतच नव्हते. पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यातच शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरावीच लागत होती. शिवाय जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना कमांड खाली येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे या भागातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव लगड यांनी उपळी तलावातून येणारे पाणी थेट तेलगावकडे जाणाऱ्या कॅनालमध्ये सोडवण्यासाठी तलावात भूमिगत जलवाहिनी करून त्याव्दारे कॅनालमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. सन २०१८ पासून लगड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या मागणीसाठी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन तेलगाव येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. तसेच आ. प्रकाश सोळंके यांची भेट घेऊन लगड यांनी त्यांच्याकडे जलवाहिनीचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर या कामासाठी तरतूद झाली. या निर्णयाचे काॅ. दत्ता डाके, डाॅ. सुरेंद्र कलंत्री, विष्णूपंत लगड, नवनाथ राठोड, बबन भिसे आदींसह शेतकऱ्यांनी स्वागत केले.

जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट

आ. सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीरतेने दखल घेत जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलसंपदा मंत्र्यांनी जलवाहिनीच्या कामास मंजुरी देत तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद केली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ. प्रकाश सोळंके दिली.

शेकडो हेक्टरला होणार लाभ

या कामास येत्या काही दिवसात सुरूवात होऊन लवकरच काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे तेलगाव, लोनवळ, नित्रुड व लगतच्या शिवारातील हजारो हेक्टर शेत जमिनी पूर्ववत जलसिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बी व उन्हाळी पिके घेणे सुलभ होणार आहे.