शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

धारूर : तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली ...

धारूर

: तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे तेलगाव व परिसरातील हजारो हेक्टर जमीन पूर्ववत ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपळी येथील कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी लोनवळ, तेलगाव, नित्रुड आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला कॅनालव्दारे येत होते. मात्र, कॅनाॅलमध्ये पाणी येण्यापूर्वी लोनवळ तलावात पाणी यायचे. हा तलाव भरल्यानंतर तेथून पुढे कालव्यातून तेलगाव, लोनवळ, नित्रुड येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. मात्र, तलाव भरण्यासाठी पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. तोपर्यंत पाणी पाळी संपते. त्यामुळे कॅनालमध्ये पाणी येतच नव्हते. पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यातच शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरावीच लागत होती. शिवाय जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना कमांड खाली येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे या भागातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव लगड यांनी उपळी तलावातून येणारे पाणी थेट तेलगावकडे जाणाऱ्या कॅनालमध्ये सोडवण्यासाठी तलावात भूमिगत जलवाहिनी करून त्याव्दारे कॅनालमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. सन २०१८ पासून लगड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या मागणीसाठी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन तेलगाव येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. तसेच आ. प्रकाश सोळंके यांची भेट घेऊन लगड यांनी त्यांच्याकडे जलवाहिनीचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर या कामासाठी तरतूद झाली. या निर्णयाचे काॅ. दत्ता डाके, डाॅ. सुरेंद्र कलंत्री, विष्णूपंत लगड, नवनाथ राठोड, बबन भिसे आदींसह शेतकऱ्यांनी स्वागत केले.

जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट

आ. सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीरतेने दखल घेत जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलसंपदा मंत्र्यांनी जलवाहिनीच्या कामास मंजुरी देत तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद केली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ. प्रकाश सोळंके दिली.

शेकडो हेक्टरला होणार लाभ

या कामास येत्या काही दिवसात सुरूवात होऊन लवकरच काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे तेलगाव, लोनवळ, नित्रुड व लगतच्या शिवारातील हजारो हेक्टर शेत जमिनी पूर्ववत जलसिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बी व उन्हाळी पिके घेणे सुलभ होणार आहे.