शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

धारूर : तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली ...

धारूर

: तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे तेलगाव व परिसरातील हजारो हेक्टर जमीन पूर्ववत ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपळी येथील कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी लोनवळ, तेलगाव, नित्रुड आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला कॅनालव्दारे येत होते. मात्र, कॅनाॅलमध्ये पाणी येण्यापूर्वी लोनवळ तलावात पाणी यायचे. हा तलाव भरल्यानंतर तेथून पुढे कालव्यातून तेलगाव, लोनवळ, नित्रुड येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. मात्र, तलाव भरण्यासाठी पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. तोपर्यंत पाणी पाळी संपते. त्यामुळे कॅनालमध्ये पाणी येतच नव्हते. पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यातच शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरावीच लागत होती. शिवाय जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना कमांड खाली येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे या भागातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव लगड यांनी उपळी तलावातून येणारे पाणी थेट तेलगावकडे जाणाऱ्या कॅनालमध्ये सोडवण्यासाठी तलावात भूमिगत जलवाहिनी करून त्याव्दारे कॅनालमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. सन २०१८ पासून लगड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या मागणीसाठी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन तेलगाव येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. तसेच आ. प्रकाश सोळंके यांची भेट घेऊन लगड यांनी त्यांच्याकडे जलवाहिनीचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर या कामासाठी तरतूद झाली. या निर्णयाचे काॅ. दत्ता डाके, डाॅ. सुरेंद्र कलंत्री, विष्णूपंत लगड, नवनाथ राठोड, बबन भिसे आदींसह शेतकऱ्यांनी स्वागत केले.

जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट

आ. सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीरतेने दखल घेत जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलसंपदा मंत्र्यांनी जलवाहिनीच्या कामास मंजुरी देत तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद केली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ. प्रकाश सोळंके दिली.

शेकडो हेक्टरला होणार लाभ

या कामास येत्या काही दिवसात सुरूवात होऊन लवकरच काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे तेलगाव, लोनवळ, नित्रुड व लगतच्या शिवारातील हजारो हेक्टर शेत जमिनी पूर्ववत जलसिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बी व उन्हाळी पिके घेणे सुलभ होणार आहे.