शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कष्टक-यांचा सरकारला ३० जानेवारीचा ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:36 IST

प्रारब्ध घेऊन बसलात, पाप- पुण्याचा हिशोब लावत बसलात तर चालणार नाही. क्रांती महत्वाची आहे. जोपर्यंत कष्टकºयांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत सळो की पळो करुन सोडू. कष्टकºयांच्या प्रश्नांवर दोन महिन्यात सरकारने धोरण बदलले नाही तर मंत्र्यांची गाडी अडविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

ठळक मुद्देसरकारने धोरण न बदलल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडविणारराज्य हमाल मापाडी महामंडळाच्या अधिवेशनात दहा ठराव मंजूर

बीड : प्रारब्ध घेऊन बसलात, पाप- पुण्याचा हिशोब लावत बसलात तर चालणार नाही. क्रांती महत्वाची आहे. जोपर्यंत कष्टकºयांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत सळो की पळो करुन सोडू. कष्टकºयांच्या प्रश्नांवर दोन महिन्यात सरकारने धोरण बदलले नाही तर मंत्र्यांची गाडी अडविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या अधिवेशनात रविवारी ते बोलत होते. या वेळी चळवळीतील नेत्या पौर्णिमा चिकरमाने, स्वागताध्यक्ष आ. जयदत्त क्षीरसागर, सुभाष लोमटे, बापूसाहेब मगदूम, डॉ. हरिष धुरट, नवनात बिनवडे, विकास मगदूम, बीड बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, अरूण डाके, प्रा.जगदीश काळे, गणपत डोईफोडे उपस्थित होते.

प्रारंभी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस राजकुमार घायाळ यांनी संविधान शपथ दिली. विकास मगदूम यांनी प्रास्ताविक केले.सुत्रसंचालन पत्रकार संजय मालाणी यांनी केले.

शनिवारी पेन्शन परिषद यशस्वी झाल्यानंतर दुसºया दिवशी हमाल मापाडी महामंडळाच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाला मशाल पेटवून प्रारंभ झाला. उपस्थितांना भावंडांनो असे संबोधित करत डॉ. बाबा आढाव म्हणाले, आता लढावे लागेल. जेलला घाबरायचं नाही, जेलसारखं माहेर नाही असे सांगत त्यांनी नाना पाटील यांच्या लढ्याची आठवण करुन दिली. जागृत जनतेची संघटीत ताकद महत्वाची असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पौर्णिमा चिकरमाने म्हणाल्या, सरकारी धोरणांमुळे देशात विषमता दिवसेंदिवस वाढतच आहे. राशन सर्वांना मिळत नाही. कष्टकºयांना पेन्शन हा हक्क असून सन्मानाने मागायची संधी या अधिवेशनातून आली आहे. एपीएल, बीपीएल भेद न करता सर्व अटी शिथील करुन कष्टकºयांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली.

महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे म्हणाले, कष्टकºयांमुळे हा देश उभा आहे. कष्टकरी घामाचं काम करतो. सरकारी कर्मचा-यांना वेतन आयोग मिळतो, मग कष्टक-यांच्या घामाचं दाम का नाही असा सवाल त्यांनी केला. आमदार- खासदारांना स्वस्थ बसू देऊ नका, त्यांना प्रश्न विचारा, कष्टकरी हीच जात समजून एकजुटीने लढा उभारा असे आवाहन त्यांनी केले.

सरकार झोपेचं सोंग करतंयराष्टÑाच्या सकल उत्पन्नात मोठा वाटा असंघटीतांचा आहे. म्हातारपणी सुखाने व आनंदाने जगता यावे ही मुळ मागणी या माध्यमातून केली जात आहे, पण मरण स्वस्त आणि जगणे महाग अशी परिस्थिती झाली आहे. सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले. बीडची ही परिषद या चळवळीला बुलंद आवाज देईल असे ते म्हणाले. बीड शहरात १६०० नवीन घरकुल मंजूर झाले आहेत. प्रस्ताव आल्यास बेघर हमाल मापाडी कामगारांना घरकुल देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही या वेळी आ. क्षीरसागर यांनी दिली.

आम्ही कोणालाही मोकळे सोडणार नाहीसंवाद हाच खरा लोकशाहीचा आत्मा आहे. कामगारांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका असून आम्ही कोणालाही मोकळे सोडणार नाही. बैठका घेऊ संवाद चर्चा आणि संघर्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवू अशी ग्वाही या वेळी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

कष्टक-यांना दरमहा तीन हजार पेन्शन द्याराज्य हमाल मापाडी महामंडळाच्या या अधिवेशनात दहा ठराव मांडण्यात आले. सर्वानुमते ते मंजूर करण्यात आले.बाजार समिती कायद्यात केलेले बदल रद्द करावेत, माथाडी कायद्यातील पळवाटांना प्रतिबंद करुन कायदा सक्षम करुन प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, असंघटीत कामगारांना संरक्षण द्यावे, शासकीय गोदामातील हमालांची व शासनाची लूट करणारी ठेकेदारी पध्दत बंद करावी, सर्व रेल्वे मालधक्क्यांच्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करुन कष्टकºयांना सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, शेतकरी, शेतमजूर, सर्व कष्टकºयांना वयाच्या ५० व्या वर्षापासून दरमहा ३ हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी. शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव, शेतकºयांना पुरेशी वीज, पाणी क्षमतेने उपलब्ध करावे, तोलाई कामगारांना बाजार समितीमध्ये समाविष्ट करावे विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन आदी मुद्यांचा यात समावेश करण्यात आला होता.

तुमच्यातही बाबा आढाव होऊ द्याअन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लढा उभारा, सत्याग्रहात भाग घ्या, संपर्क वाढवा, संघटन मजबूत करा, तुमच्यातही बाबा आढाव निर्माण होऊद्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच सरकारला ३० जानेवारीपर्यंत डेडलाइन देत जेलभरोचा इशारा बाबा आढाव यांनी दिला.