शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार पालकांनी पुस्तके केली परत, आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

बीड : पर्यावरण संरक्षणासाठी समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्याचा ...

बीड : पर्यावरण संरक्षणासाठी समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तो आता अमलात आणला जात असून पालकांचाही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांमार्फत शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे शाळा भरली नाही. मुलांनी पाठ्यपुस्तके हाताळलीदेखील नाहीत. काहींनी तर उघडलीच नाहीत. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरले नाहीत, तर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग कसे तरी दोन महिनेच भरले. या विद्यार्थ्यांकडे वाटप केलेली पुस्तके मागील वर्गातून पुढच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने कोणावरही सक्ती न करता पालक आणि विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत इच्छुकांकडून पुस्तके जमा करावीत, तसेच किती संच जमा होतील याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार पालकांनी पुस्तके जमा केल्याचे सांगण्यात येत आहे, तर काही पालक कोविड परिस्थिती सामान्य झाल्यानंतर संबंधित शाळेत आपल्या मुलांना मागीलवर्षी मिळालेली पुस्तके जमा करणार आहेत.

सोशल मीडियाचा आधार घेणार

शालेय पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरासाठी ही पुस्तके जमा करण्यात येत आहेत. यासाठी व्हाॅट्‌स ॲप, फेसबुक, ई- मेल, प्रसारमाध्यमांचा उपयोग करून जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणाचा संदेश पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने बीड जि. प. शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.

-----

कागदासाठी झाडे तोडावी लागतात. पुस्तके परत परत वापरली, तर ते चांगलेच आहे. आमच्या लहानपणी मोठ्या भावाची पुस्तके आम्ही वापरत होतो. आमची पुस्तके लहान भाऊ, बहीण वापरायचे. पुस्तके एका वर्षात खराब होत नाहीत. पुस्तके सुव्यवस्थित ठेवण्याची मुलांना सवय लागेल. कागदाची बचत होईल, पर्यायाने पर्यावरण संरक्षण व आर्थिक बचत होईल. पालकांनी शालेय पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी प्रतिसाद द्यावा.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.) बीड.

------------

पुस्तकांचा पुनर्वापर व्हायलाच पाहिजे. गरजूंना ती मिळतील. शक्यतो पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांकडून पुस्तके हाताळणी नीट होत नसते. ती गहाळही होतात. माझी मुलगी चौथी उत्तीर्ण झाली आहे. ती पाचवीच्या वर्गात गेली. शासनाच्या आवाहनानुसार तिची पुस्तके मी जबाबदार पालक या नात्याने शाळेत जमा करणार आहे.

- रामप्रसाद शेंडगे, पालक, बीड.

-------

पुस्तके पुन्हा वापराची योजना चांगली आहे. आपण लहानपणी तसेच करत होतो. कागद निर्मितीसाठी झाडांची कत्तल थांबली पाहिजे. माझा मुलगा सहावीत होता. तो सातवीत गेला आहे. गतवर्षी त्याला पुस्तके मिळाली होती. शिक्षण विभाग, शाळेच्या आवाहनानुसार आणि दिल्या जाणाऱ्या वेळेत पुस्तके जमा करणार आहे.

- जालिंदर कागदे, पालक, बीड.

---------

८० हजार पुस्तकांचे नियोजन

पुस्तके पुनर्वापरासाठी बीड जिल्ह्यात ८० ते ९० हजार पुस्तकांचे संकलनासाठी नियोजन करण्यात आले आहे. अनेक पालक शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देतात, त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तके जमा होऊन ती पुढच्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांना कामी येतील.

--------

मागील वर्षी मोफत पाठ्यपुस्तके मिळालेले विद्यार्थी : ३,६१,९६८

वाटप केलेली पुस्तके : २२०००००

यावर्षी मोफत पाठ्यपुस्तके लागणारे विद्यार्थी : ३,४१,८८७

पुस्तक पुनर्वापर योजनेतून जमा होणारी पुस्तके : ८६,०००

मागणी करावी लागणारी पुस्तके : २१,२०,०००

---