शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दोन लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:25 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बीड जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद्याप २ लाखाहून जास्त शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ५०८ कोटी रुपयांची कर्जमाफी, रक्कमही प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद्याप २ लाखाहून जास्त शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.

शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर शासन निर्णयानुसार निकषपात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. आवश्यक माहिती बॅँकांनी शासनाकडे पाठविली. निकषानुसार पात्र ठरलेली शेतकरी संख्या ३ लाख ७ हजार ६४ इतकी निश्चित झाली. ६ डिसेंबरपर्यंतच्या तीन टप्प्यात ८९ हजार २८३ शेतकºयांना ४३० कोटी ५० लाख रुपये कर्जमाफी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ४० हजार १८८ शेतकºयांचा समावेश होता. तर उर्वरित शेतकरी इतर राष्टÑीयकृत बॅँकांचे कर्जदार आहेत.

दरम्यान ११ डिसेंबरपर्यंत ४६२ कोटी १५ लाख रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेले असून ७५ हजार ९०९ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ३३४ कोटी ४७ लाख रुपये जमा झाले. त्यानंतर ७८ कोटी रुपये आणखी मंजूर झाल्याचे समजते. आतापर्यंत ५०८ कोटी रुपये कर्जमाफीपोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.३८० कोटी रुपयांचे वाटपछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना ५०८ कोटी रुपये मंजूर झाले असून ३८० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही संबंधित बॅँकांकडून सुरु आहे.- विजय चव्हाणव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅँक, बीड.

पात्र शेतक-यांचे सर्व निकषतपासण्याच्या सूचना शासनस्तरावर वारंवार मिळत असून बॅँकांना सर्व माहिती अपलोड करण्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व राष्टÑीयकृत बॅँका व जिल्हा बॅँकेचे लेखापरिक्षण पूर्ण झालेले असल्याने बॅँकांकडूनही माहिती पोहचविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘पाचव्या ग्रीनलिस्ट’कडे शेतक-यांचे लक्षदरम्यान या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणे, नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.प्रोत्साहन योजनेसाठी जिल्हा बॅँकेचे ३५ हजार सभासद पात्र असून हा निधी ९२ लाखांपर्यंत असल्याचे सुत्रांनी सांगितले.कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत संथ होत आहे तर ही प्रक्रिया गतीने करण्यासाठी शासनाकडून वारंवार सूचना मिळत आहेत.अद्यापही २ लाखाहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पाचव्या ग्रीनलिस्टची ते वाट पाहत आहेत.