शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

दहा महिन्यांनंतर शाळांमध्ये किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST

बीड : शासनाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट झाला. दहा महिन्यानंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला. ...

बीड : शासनाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट झाला. दहा महिन्यानंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला. परंतु कोरोनाचे भय अद्यापही कमी झाले नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी ४० टक्के विद्यार्थी जिल्ह्यातील शाळांमध्ये उपस्थित होते. यावरून कोरोनाचे भय पालकांच्या मनातून अद्यापही कमी झाले नसल्याचे दिसून आले. बहुतांश शाळांतील शिक्षकांची कोविड चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यास अडचणी होत्या. १ फेब्रुवारीनंतर शाळांमध्ये उपस्थिती वाढेल असा अंदाज शिक्षकांना आहे. जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. दोन महिन्यात या वर्गांमध्ये विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण साधारण ४५ टक्के होते. तर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी उपस्थितीचे प्रमाण ४० ते ४५ टक्के होते.

---

शाळेत आल्यानंतर खूप छान वाटले. मास्क लावून आलो होतो. टेम्परेचर तपासले. एका बेंचवर एक विद्यार्थी होता. वर्गात शिक्षकांनी नियम सांगितले. शाळेत रोज येणार आहे.

-- अमर विजय इंगळे, विद्यार्थी

---

पहिला दिवस आनंदाचा होता. मैत्रिणी भेटल्या. ऑनलाइनपेक्षा फेस टू फेस बोलता येत असल्याने शाळेत शिकवलेले समजते. शाळेत आज गणित, विज्ञान शिकविले. - श्रेया केदारनाथ राऊत, विद्यार्थिनी

--------

अनेक दिवसानंतर शाळेत आल्यावर चांगले वाटले. सर जे शिकवतात ते समजते. प्रथम सत्रापर्यंत ऑनलाईन शिकलो, आता रोज शाळेत येणार असून परीक्षेसाठी तयारी करणार आहे. - वैभव सदाशिवराव दराडे, विद्यार्थी

----------

शाळेत आल्याने बरे वाटले. आतापर्यंत घरी ऑनलाईन अभ्यास करत होते. आईला घरकामात मदत करत होते. मास्क लावून शाळेत गेले, तपासणी केली. त्यामुळे सुरक्षित वाटले. - वृषाली विष्णू जोगदंड, विद्यार्थिनी

----------

शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष ज्ञानार्जन करून मुख्य प्रवाहात येतील. त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता, परंत काही पालक साशंक आहेत. - नितीन येळवे, शिक्षक, शिवाजी विद्यालय.

----

कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास उशीर झाला. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसणे, नेटवर्कमुळे ऑनलाईनमध्ये अनेक समस्या होत्या. शाळा पूर्ववत सुरू झाल्याने शिक्षक- विद्यार्थ्यांचा संवाद, संपर्क राहील. विद्यार्थी उत्साही दिसून आले. पालकांचे शंका समाधान केले. -निलेश मालपाणी, शिक्षक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय.

------------

पहिल्या दिवशी उपस्थिती

विद्यार्थी ९२ हजार ४९१

शिक्षक ३४००

शाळा सुरू १०००

----

शिक्षकांची कोविड चाचणी ३४७३

पॉझिटिव्ह शिक्षक ५३