शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कमी भाव देणा-या व्यापा-यांवर कारवाई सुरु होताच तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 16:41 IST

हमीभाव जाहीर झाल्यानंतरही त्यास न जुमानत कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य  शासनाने चौकशी सुरु केली आहे. यावर सुरुवातीस  डोळेझाक केलेल्या कृषिउत्पन्न बाजार समितीने  आता कारवाईची बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देशासनाने यावर्षी तुरीचा हमीभाव हा 5 हजार 50 रुपये असा जाहीर केला आहे.व्यापारी मात्र हा हमीभाव जाहीर होण्याआधी व नंतरही तुरीस 4 हजारांपेक्षाही कमी भाव देत असत. कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य  शासनाने चौकशी सुरु केली आहे. कारवाईच्या भीतीने व्यापा-यांनी तूर खरेदी बंद केली आहे.

ऑनलाईन लोकमत 

बीड/माजलगाव, दि. २७ :  हमीभाव जाहीर झाल्यानंतरही त्यास न जुमानत कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य  शासनाने चौकशी सुरु केली आहे. यावर सुरुवातीस  डोळेझाक केलेल्या कृषिउत्पन्न बाजार समितीने  आता कारवाईची बडगा उगारला आहे.या कारवाईच्या भीतीने व्यापा-यांनी तूर खरेदी बंद केली आहे. यामुळे जवळपास ३०० पोते तूर पडून आहे.

शासनाने यावर्षी तुरीचा हमीभाव हा 5 हजार 50 रुपये असा जाहीर केला आहे. माजलगाव येथील व्यापारी मात्र हा हमीभाव जाहीर होण्याआधी व नंतरही तुरीस 4 हजारांपेक्षाही कमी भाव देत असत. या बाबत शासनाकडे तक्रारी गेल्यानंतर शासनाने नाफेड आणि फेडरेशन यांच्या मार्फत शासकिय तुर खरेदीला सुरुवात केली. शासकीय तूर खरेदी चालू असताना काही व्यापा-यांनी अडचणीत असलेल्या शेतक-यांची तूर विविध  युक्त्या लढवून कमी भावात खरेदी केली. यानंतर त्यांनी हीच तूर  ज्यादा भावाने खरेदी केंद्रावर विकली व मोठ्या प्रमाणात नफा कमावला. 

या बाबत तक्रार दाखल होताच अशा काही व्यापा-यांची राज्य शासनाकडून सध्या चौकशी चालू आहे. व्यापा-यांनी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 11 हजार 815 क्विंटल तुर खरेदी केली. या तुरीस 3 हजार 700  ते 4 हजार 175 इतका भाव दिला. मार्च नंतर तुरीचे भाव पाडत व्यापा-यांनी 3 हजार ते 3 हजार 500 एवढा कमी भाव दिला. या कमी भावाच्या खरेदीच्या पावत्या बाजार समितीकडे जात असतानाही समितीने यावर कसलाच आक्षेप घेतला नाही. 

व्यापा-यांकडुन खरेदी झालेल्या तुरीच्या या सर्व व्यवहाराची शासनाने माहिती मागवली आहे. यामुळे बाजार समिती आता खबडून जागी झाली व  अशा व्यापा-यांवर कारवाई चा बडगा उगारत आहे. या कारवाईनंतर मात्र त्यांनी समितीत आलेली शिल्लक तूर खरेदी करण्यास नकार दिला आहे.  शेतक-यांची जवळपास 300 क्विंटल तूर अजून पडून असून व्यापारी ही तूर खरेदी करण्यास नकार देत आहेत. व्यापा-यांवर काही कारवाई होणे दूरच पण तूर शिल्लक राहिल्याने शेतक-यांचे मात्र नुकसान होत आहे. 

कोणावर होणार कारवाई व्यापारी खरेदी करीत असलेल्या तुरीच्या भावाची संपुर्ण माहिती ही बाजार समितीला माहित असते. तसेच दररोज कर्मचारी देखील मालाचे बिट चालु असतांना हजर असतात. मग शेतक-यांची एवढया मोठया प्रमाणात लुट चालु असतांना बाजार समितीचे कर्मचारी काय करीत होते ? आता व्यापा-यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. मात्र, खरेदीच्या वेळी बाजार समितीचे कर्मचारी देखील हजर असत यामुळे त्यांच्यावरहि कारवाई होणार का असा सवाल शेतकरी करत आहेत.  

दोषींवर कारवाई करणार कमी भावाने तूर खरेदी बाबत शासनाच्या आदेशावरुन चौकशी सुरु आहे.  यात कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. यासोबतच बाजारातील विक्री न झालेल्या तुरी बाबत लवकरच तोडगा काढु. - अशोक डक, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव