शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

लॉटरीने मिळालेले बियाणे शेतकऱ्यांना देण्यास व्यापाऱ्यांची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

-- कृषी अधिकारी व्यापा-यांना घालत आहेत पाठीशी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : कृषी अधिकाऱ्यांचे मौन माजलगाव : पुरुषोत्तम करवा शेतात ...

-- कृषी अधिकारी व्यापा-यांना घालत आहेत पाठीशी

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : कृषी अधिकाऱ्यांचे मौन

माजलगाव :

पुरुषोत्तम करवा

शेतात पेरण्यासाठी सोयाबीन व तुरीचे बियाणे शासकीय अनुदानात मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्याची सोडत काढण्यात आली. मात्र लॉटरी पध्दतीने मिळालेले बियाणे शेतकऱ्यांना परमिट मिळूनही देण्याबाबत व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. अशा व्यापाऱ्यांना कृषी अधिकारी पाठीशी घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अनुदानित बियाणांसाठी माजलगाव तालुक्यातील ५९१ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मागील महिन्यात नोंद केली होती. त्याची सोडत पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीमध्ये सोयाबीन बियाणांसाठी २०२, तर तूर बियाणांसाठी १६८ शेतकरी निवडले गेले.

माजलगाव तालुक्यासाठी सोयाबीनचे बियाणे १६८ क्विंटल मिळाले. सोयाबीन बियाणे एका एकरला ३० किलो देण्याचा नियम आहे, तर तुरीचे बियाणे माजलगाव तालुक्यासाठी ९.८० क्विंटल देण्यात आले होते. एका शेतकऱ्यास पाच एकर व एकरी ६ किलो बियाणे देण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती.

महाडीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना येथील तालुका कृषी कार्यालयाकडून हे बियाणे घेण्यासाठी परमिटही देण्यात आले. कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना परमिट देऊन ४-५ दिवस झाले. परंतु यातील अनेक शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या व्यापाऱ्यांकडून अद्याप बियाणेच दिले गेले नसून व्यापाऱ्यांकडून बियाणे देण्यास चालढकल केली जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही कृषी अधिकारी शेतकऱ्यांची दखल न घेता व्यापाऱ्यांची बाजू घेत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

----

१०० रुपये वाचविण्यासाठी १०० खर्च

अनुदानामध्ये बियाणे घेतल्यास शेतकऱ्यांचा थोडाफार फायदा होती, परंतु या ठिकाणी बियाणे घेण्यास आल्यानंतर व्यापाऱ्यांकडून वेळेत बियाणे दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा जावे लागत आहे. अनुदानाच्या बियाणांतून १०० रुपये वाचवायला गेलो, पण ये-जा करण्यात १०० रुपये खर्च आला असल्याचे शेतकरी सांगत होते.

------

मला कृषी कार्यालयाने तूर बियाणाचे परमिट देऊन चार पाच दिवस उलटले. मी सांगितलेल्या दुकानदाराकडे अनेक वेळा गेलो असता, त्यांनी बियाणे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना अनेक वेळा बोललो असता, त्यांनी वारंवार व्यापाऱ्यांचीच बाजू मांडली. याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार देणार आहे.

- विलास साळवे, शेतकरी

------

लॉटरी पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना बियाणे मिळाले आहे, त्या शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या दुकानांमधून बियाणे खरेदी करायचे आहे. एखाद्या दुकानात एपीएल संपले असले तरी शेतकऱ्यांनी दुसऱ्या दुकानातून बियाणे घ्यावे.

- शिवप्रसाद संगेकर, तालुका कृषी अधिकारी, माजलगाव