शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

डोक्याइतके झाड; पण तुरीच्या शेंगाच लगडल्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

गेवराई : वांझ तुरीच्या बियाण्यांमुळे तुरीला शेंगा लागल्या नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी ...

गेवराई : वांझ तुरीच्या बियाण्यांमुळे तुरीला शेंगा लागल्या नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे दिली होती. त्यावर नेमलेल्या तालुकास्तरीय समितीने प्रत्येक शेताची पाहणी करून तूरपिकाला ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेंगा लगडल्या नसल्याने यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पाहणी अहवालात नमूद केले आहे. झाड डोक्याइतके वाढले; पण शेंगाच लगडल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील एका कृषी साहित्य दुकानातून महाबीज सीडस कंपनीच्या ‘बीडीएन ७११’ या तूर बियाण्यांच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. १९ जून रोजी त्यांनी शेतामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली होती. तसेच या तुरीला विविध खते, औषधे फवारणी देण्यात आली. मात्र तब्बल सहा महिने लोटले तरी सध्या स्थितीत तूरपीक डोक्याएवढे वाढले, मात्र शेंगाच आल्या नाहीत. तसेच शेजाऱ्यांच्या तुरीचे खळे होऊन विक्री झाल्याने टकले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे २८ डिसेंबर रोजी प्रथम बियाण्यांची रीतसर तक्रार केली. त्यानुसार १९ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी बी. टी. सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र खामगावचे हनुमान गरुड, पंचायत समितीचे पुरी, संदीप देशमुख, आर. आर. चव्हाण, महाबीज कंपनीचे धस, कृषी मंडळ अधिकारी दीपक राठोड यांच्या तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष शेतात पाहणी केली. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये पिकाच्या परिपक्वता कालावधीत संपूर्ण क्षेत्रांमध्ये फरक दिसून आल्याचे नमूद करीत एक एकर क्षेत्रात ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.