शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी ...

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. दरम्यान मागील जवळपास वर्षभरापासून ही सिग्नल प्रक्रिया बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दीची ठिकाणं असलेल्या बार्शीनाका ते साठे चौक, त्यांनंतर सुभाष रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नका या परिसरात सिग्नल लावण्यात आलेले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून ही सर्व सिग्नल प्रणाली बंद आवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी कायम असते, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर आहेत. सिग्नल सुरु असल्यानंतर या रोडवरील पॉईंटवर एक पोलीस कर्मचारी पुरेसा असतो. मात्र, आता एका पॉईंटवर किमान ३ पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असतात.

सिग्नल नसल्यामुळे वाहतू कोंडी झाल्यावर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना देखील जास्तीचे श्रम करावे लागतात. त्यामुळे सिग्नल प्रणाली सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी त्याठिकाणी कर्तव्यावर असतात, सिग्नल सुरु झाल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, सिग्नल सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली नगरपालिकेशी वेळोवेळी पत्रव्यावहार करण्यात आला आहे.

कैलास भारती वाहतूक पोलीस प्रमुख

प्रतिक्रिया

शहरातील सिग्नलची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लगात आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ शहरातील सिग्नल सुरु करावेत.

कुलदीप करपे स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिक्रिया

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, लाखों रुपये दुरुस्तीवर खर्च करून देखील सिग्नल प्रणाली बंद आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱीस्तरावर चौकशी करावी व यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी

राहुल वायकर, संभाजी ब्रिगेड संघटना बीड

प्रतिक्रिया

मुख्य बाजारपेठात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सिग्नल सुरु तत्काळ सुरु करणे गरजेचे आहे.

अशोक जगताप, पालसिंगण