शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी ...

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. दरम्यान मागील जवळपास वर्षभरापासून ही सिग्नल प्रक्रिया बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दीची ठिकाणं असलेल्या बार्शीनाका ते साठे चौक, त्यांनंतर सुभाष रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नका या परिसरात सिग्नल लावण्यात आलेले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून ही सर्व सिग्नल प्रणाली बंद आवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी कायम असते, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर आहेत. सिग्नल सुरु असल्यानंतर या रोडवरील पॉईंटवर एक पोलीस कर्मचारी पुरेसा असतो. मात्र, आता एका पॉईंटवर किमान ३ पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असतात.

सिग्नल नसल्यामुळे वाहतू कोंडी झाल्यावर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना देखील जास्तीचे श्रम करावे लागतात. त्यामुळे सिग्नल प्रणाली सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी त्याठिकाणी कर्तव्यावर असतात, सिग्नल सुरु झाल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, सिग्नल सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली नगरपालिकेशी वेळोवेळी पत्रव्यावहार करण्यात आला आहे.

कैलास भारती वाहतूक पोलीस प्रमुख

प्रतिक्रिया

शहरातील सिग्नलची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लगात आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ शहरातील सिग्नल सुरु करावेत.

कुलदीप करपे स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिक्रिया

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, लाखों रुपये दुरुस्तीवर खर्च करून देखील सिग्नल प्रणाली बंद आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱीस्तरावर चौकशी करावी व यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी

राहुल वायकर, संभाजी ब्रिगेड संघटना बीड

प्रतिक्रिया

मुख्य बाजारपेठात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सिग्नल सुरु तत्काळ सुरु करणे गरजेचे आहे.

अशोक जगताप, पालसिंगण