शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी ...

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. दरम्यान मागील जवळपास वर्षभरापासून ही सिग्नल प्रक्रिया बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दीची ठिकाणं असलेल्या बार्शीनाका ते साठे चौक, त्यांनंतर सुभाष रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नका या परिसरात सिग्नल लावण्यात आलेले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून ही सर्व सिग्नल प्रणाली बंद आवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी कायम असते, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर आहेत. सिग्नल सुरु असल्यानंतर या रोडवरील पॉईंटवर एक पोलीस कर्मचारी पुरेसा असतो. मात्र, आता एका पॉईंटवर किमान ३ पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असतात.

सिग्नल नसल्यामुळे वाहतू कोंडी झाल्यावर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना देखील जास्तीचे श्रम करावे लागतात. त्यामुळे सिग्नल प्रणाली सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी त्याठिकाणी कर्तव्यावर असतात, सिग्नल सुरु झाल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, सिग्नल सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली नगरपालिकेशी वेळोवेळी पत्रव्यावहार करण्यात आला आहे.

कैलास भारती वाहतूक पोलीस प्रमुख

प्रतिक्रिया

शहरातील सिग्नलची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लगात आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ शहरातील सिग्नल सुरु करावेत.

कुलदीप करपे स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिक्रिया

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, लाखों रुपये दुरुस्तीवर खर्च करून देखील सिग्नल प्रणाली बंद आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱीस्तरावर चौकशी करावी व यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी

राहुल वायकर, संभाजी ब्रिगेड संघटना बीड

प्रतिक्रिया

मुख्य बाजारपेठात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सिग्नल सुरु तत्काळ सुरु करणे गरजेचे आहे.

अशोक जगताप, पालसिंगण