शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:33 IST

..... डोंगरकिन्ही-पारनेर रस्त्याची दुरवस्था बीड : डोंगरकिन्ही येथून जामखेडला जाणारा डोंगरकिन्ही-पारनेर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन दुचाकी चालविणे ...

.....

डोंगरकिन्ही-पारनेर रस्त्याची दुरवस्था

बीड : डोंगरकिन्ही येथून जामखेडला जाणारा डोंगरकिन्ही-पारनेर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन दुचाकी चालविणे देखील अवघड बनले आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे. या रस्त्याचे काम मंजूर होऊनही अडले आहे, असेही येथील नागरिकांनी सांगितले.

...

अंगणवाडी सेविकांना दिलासा

बीड : जिल्ह्यात दोन अंगणवाडी सेविकांंना कोरोनात जीव गमवावा लागला. या सेविकांना शासनाने ५० लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. उशीरा का होईना अंगणवाडी सेविकांच्या वारसांंना न्याय मिळाला आहे. मंजूर विमा झाल्याने अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आठ महिन्यानंतर या अंगणवाडी सेविकांंना न्याय मिळाला आहे.

....

मौजवाडीत निर्जंतुकीकरण फवारणी

बीड : तालुक्यातील माैजवाडी येथे कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तेजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोडीयम हायपोस्लोराईची फवारणी करण्यात आली. नागिरकांनी कोरोनाकाळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच चव्हाण यांनी केले आहे.

...

साईडपट्ट्यावर अतिक्रमण

अंमळनेर : बीड-नगर अंमळनेर मार्गे जाणा-या रस्त्यावर साईडपट्ट्यावर अतिक्रमण झाले आहे. नागरिकांनी रस्त्यावर गावोगावी सरपंच, कचरा टाकला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गवत उगवले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या साईडपट्ट्यांवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहेे.

...

फळझाडे जगविण्यासाठी धडपड

आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अनेक गावात फळझाडांची शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु उन्ह्याळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे फळबागांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी शेततळ्यात टँकरने पाणी आणून टाकले आहे. तर काहींनी थेट झाडांना दिले आहे. फळबागा वाचण्यासाठी आता शेतक-यांंना पावसाची प्रतीक्षा आहे.

...

सुलेमान देवळा येथे पुलाची मागणी

धानोरा : धानोरा-सावरगाव रस्त्यावर सुलेमान देवळा गावानजीक कांबळी नदीवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलावरुन नेहमी पाणी असते. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी आहे. परंतु गेल्या ४० वर्षापासून येथे पूल झाला नाही. तरी येथे नवीन पुलाची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

....

जनावरांच्या चा-याची टंचाई

बीड : जिल्ह्याच्या अनेक भागात उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे मका, घास पिके जगविण्यासाठी शेतक-यांना अडचणी येत आहे. त्यात जनावरांच्या चा-याची टंचाई भासत आहे. अनेकांना विकतचा चारा घेऊन जनावरे जगविण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

...