शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

जलाधारासाठी जनआंदोलनाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST

विजयकुमार गाडेकर शिरूर कासार : सुवर्णमहोत्सव पाहिलेल्या सिंदफना मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची न वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीदेखील खुंटली आहे. ...

विजयकुमार गाडेकर

शिरूर कासार : सुवर्णमहोत्सव पाहिलेल्या सिंदफना मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची न वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीदेखील खुंटली आहे. लाखो रुपयांचा खर्च पाण्यात नव्हे तर माती कामातच गेल्याचे चित्र प्रकल्प परिसरातील लाभार्थी शेतकरी सोळा वर्षांपासून पाहत आले आहेत. हे काम अपूर्ण असल्याने झालेला खर्च अनाठायी ठरतो आहे. निव्वळ सांडव्याचे काम बाकी असून, ते पूर्ण झाले तर शेतकऱ्यांना मोठा जलाधार मिळू शकतो. यासाठी जनआंदोलनाची वेळ आली आहे.

१९६५ साली सिंदफना मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन शिरूरसह पिंपळनेर, गोमळवाडा, रुपूर राक्षसभुवन ते थेट ब्रह्मनाथ येळंबपर्यंत पाणी गेले. परिणामी हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी हरितक्रांतीचा जनक बनला. मात्र दिवस मागे पडत गेले. वर्ष उलटत गेले आणि हळूहळू प्रकल्पात गाळ जमा होत पाणी साठवण क्षमता घटली. भीजक्षेत्रसुध्दा कमी होत गेले. त्यामुळे सांडव्याची उंची वाढविण्याच्या मागणीने जोर धरला. पुढे उंचीचा हा प्रश्न मंजूरही झाला आणि कामाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र मातीच्या भिंतीच्या उंचीचे काम पूर्ण झाले आणि नेमके सांडव्याची उंची वाढविण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला तो आजतागायत संपलेला नाही. प्रकल्प भरला की पाणी सिंदफना नदीतून वाहून वाया जाते. मात्र निष्पत्ती होत नसल्याचे दुःख शेतकरी निमूटपणे सहन करतो आहेत. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला होता. अवघ्या एक वर्ष कालमर्यादेत काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. परंतु सोळा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड लोटला तरी या कामाला पूर्णविराम मिळालेला नाही, हे शल्य कायम बोचते आहे. २००५ पासून निवेदन, आंदोलन, धरण क्षेत्रात उपोषण असे सर्व सोपस्कार शेतकेऱ्यांनी केले. याकामी सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण त्यावेळचे मुख्यमंत्री व संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन, उपोषण करून लक्ष वेधले होते. त्यानंतर सचिन जायभाय या पिंपळनेरच्या तरुणाने याकामी पुढाकार घेतला होता. मात्र कशात आडकाठी येते हे समजलेले नाही. हे काम पूर्ण झाले तर पाणीसाठा वाढून पुन्हा एकदा शिवार सुजलाम् सुफलाम् पाहता येणार आहे.

दृष्टिक्षेपातील सिंदफना मध्यम प्रकल्प

प्रकल्प उभारणी १९६५ ,

उंची वाढवण्याच्या कामाला सुरुवात २००५ ,

लाभक्षेत्रातील गावे- पिंपळनेर, गोमळवाडा, रूपूर राक्षसभुवन , कोळवाडी, शिरूर व ब्र. वेळंब,

140821\4137img-20210810-wa0004.jpg

फोटो