शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतावर उपासमारीची वेळ सरकारकडून केवळ नावाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

बीड : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडण्याचे अनमोल असे कार्य करणारे तसेच मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांवर कोरोनामुळे उपासमारीची ...

बीड : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडण्याचे अनमोल असे कार्य करणारे तसेच मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अनेकांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे मोलमजुरी करून लोककलावंत उदरनिर्वाह करत आहेत. दरम्यान, जे मानधन दिले जाते ते अतिशय कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची व पुन्हा एकदा नोंदणी कार्यक्रम हाती घेण्याची मागणी लोककलावंतांकडून होत आहे.

राज्य सरकारची मदत कधी मिळणार?

५० वर्षे पूर्ण झालेल्या कलावंतांना २२५० रुपये जाहीर झाले आहेत.

ज्यावेळेस यासाठी शासनाकडून पैसे दिले जातील त्यावेळी लोककलावंतांच्या खात्यावर ही मानधन रक्कम जमा केली जाईल.

अनेक वेळा वेळेवर मदत मिळत नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

मदत हातात किती उरणार?

कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम थांबवले आहेत. त्यातून कलावंत अडचणीत आले आहेत.

पूर्वी क वर्गातील लोककलावंतांना १५०० रुपये मानधन मिळत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन २२५० रुपये मिळत आहेत.

ही मदत काही मोजक्याच लोकांना मिळत आहे. त्यामुळे शेकडो कलाकार अजूनही उपेक्षित आहेत.

दरवर्षी फक्त ६० जणांची होते निवड

दरवर्षी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कलावंतांची निवड केली जाते. राष्ट्रीयस्तरावरील कलावंतांना अ दर्जा राज्यस्तरावरील ब दर्जा व स्थानिकस्तरावर क दर्जा दिला जातो.

प्रत्येक वर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी जवळपास १५०० अर्ज येतात. त्यातून ६० जण निवडले जातात.

लोककलावंतांची अवस्था फार वाईट झाली आहे. अनेक जण शेतमजुरी करून संसार चालवत आहेत. तर, घरच्या महिला भांडे-धुणे करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे शासनाने नोंदणी नसलेल्या लोककलावंतांनादेखील आर्थिक मदत करावी.

भानू वासुदेव

गत दोन वर्षांपासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न आहे. कामो बंद आहेत, त्यामुळे उपासमारीची वेळ आली असून, विविध प्रकारची मोलमजुरीची कामे करावी लागत आहेत.

राजन गोसावी

बँडबाजा बंद आहे, त्यामुळे पथकातील सर्व जण मजुरी करत आहेत. शेतातील कामे करून मिळेल त्या पैशाने संसार चालवत आहोत. त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावी.

अंगद पाटुळे

140821\14_2_bed_14_14082021_14.jpg

बॅंड पथकातील अंगद पाटुळे आपले साहित्य दुरुस्त करताना दिसत आहेत.