शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

तीन काळे कृषी कायदे, वाढत्या महागाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : भाजप सरकारने देशावर लादलेले तीन काळे कृषी कायदे आणि वाढत्या महागाईचा निषेध करीत शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ ...

अंबाजोगाई : भाजप सरकारने देशावर लादलेले तीन काळे कृषी कायदे आणि वाढत्या महागाईचा निषेध करीत शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या 'भारत बंद' मध्ये काँग्रेसने सहभाग नोंदविल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत २६ मार्च रोजी सहकार भवन हॉल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या 'भारत बंद' मध्ये काँग्रेसने सहभाग नोंदविला. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमितीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच, परंतु,नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भाजपा विरोधी सर्व राजकीय पक्ष, समविचारी संघटना आणि जनतेला सोबत घेऊन केंद्र सरकारचा हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.

===Photopath===

260321\avinash mudegaonkar_img-20210326-wa0097_14.jpg