शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

तीन काळे कृषी कायदे, वाढत्या महागाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : भाजप सरकारने देशावर लादलेले तीन काळे कृषी कायदे आणि वाढत्या महागाईचा निषेध करीत शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ ...

अंबाजोगाई : भाजप सरकारने देशावर लादलेले तीन काळे कृषी कायदे आणि वाढत्या महागाईचा निषेध करीत शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या 'भारत बंद' मध्ये काँग्रेसने सहभाग नोंदविल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत २६ मार्च रोजी सहकार भवन हॉल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या 'भारत बंद' मध्ये काँग्रेसने सहभाग नोंदविला. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमितीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच, परंतु,नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भाजपा विरोधी सर्व राजकीय पक्ष, समविचारी संघटना आणि जनतेला सोबत घेऊन केंद्र सरकारचा हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.

===Photopath===

260321\avinash mudegaonkar_img-20210326-wa0097_14.jpg