शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज उतरला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

बीड : सर्वेच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले. याविरुद्ध ...

बीड : सर्वेच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले. याविरुद्ध बीडमध्ये शनिवारी आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल ते सुभाष रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत आरक्षणावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणीदेखील नागरिकांमधून करण्यात आली.

यावेळी आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील, रमेश पोकळे, सी.ए. बीबी जाधव, अशोक सुखवसे, ॲड. मंगेश पोकळे, सुधीर काकडे, नवनाथ प्रभाळे, स्वप्निल गलधर, राजन घाग, मनोज जरांगे, सुभाष जावळे, गणेश मोरे यांच्यासह हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग होता. महाविकास आघाडी सरकारने सर्वेच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाले. तसेच मराठा आरक्षणासोबत इतर मागण्या जर ५ जुलैपर्यंत मान्य केल्या नाहीत तर, अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारादेखील मेटे यांच्याकडून यावेळी देण्यात आला. तसेच मोर्चा जाहीर केल्यानंतर ईडब्लूएसचा निर्णय शासनाने घेतला त्याचा फायदा समाजातील मुलांना झाला असून, नोकरी मिळाली आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा राज्यात सर्वत्र सुरू राहणार आहे. तर, मराठा आमदारांनीदेखील या मोर्चात सहभागी व्हावे आणि पक्षाच्या नावावर त्यांचे आस्तित्व संपलेले असेल तर, त्यांचा धिक्कार आहे. या सरकारला कोणत्याच समाजाचे काही पडलेले नाही. त्यामुळे विविध स्तरावरील आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याची टीकादेखील मेटे यांनी केली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील रमेश पोकळे, मनोज जरांगे, राजन घाग यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना शिष्टमंडळाने यावेळी देण्यात आले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जवळपास सर्व प्रमुख अधिकारी व ३५० पोलीस कर्मचारी शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होेते. मात्र, मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी शिस्तीचे पालन केले. परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे आयोजकांसह इतरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या...

न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळावे यासाठी कायदेशीररीत्या न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या प्रकारे प्रस्ताव तयार करून राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवावा, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, सारथी संस्था पूर्ण ताकदीने कार्यान्वित करावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात भरीव आर्थिक तरतूद करून थेट ५० हजार रुपये कर्ज द्यावे, यासह इतर मागण्यांवर शासनाने लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी यांनादेखील देण्यात आले आहे.