शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज उतरला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

बीड : सर्वेच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले. याविरुद्ध ...

बीड : सर्वेच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले. याविरुद्ध बीडमध्ये शनिवारी आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल ते सुभाष रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत आरक्षणावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणीदेखील नागरिकांमधून करण्यात आली.

यावेळी आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील, रमेश पोकळे, सी.ए. बीबी जाधव, अशोक सुखवसे, ॲड. मंगेश पोकळे, सुधीर काकडे, नवनाथ प्रभाळे, स्वप्निल गलधर, राजन घाग, मनोज जरांगे, सुभाष जावळे, गणेश मोरे यांच्यासह हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग होता. महाविकास आघाडी सरकारने सर्वेच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाले. तसेच मराठा आरक्षणासोबत इतर मागण्या जर ५ जुलैपर्यंत मान्य केल्या नाहीत तर, अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारादेखील मेटे यांच्याकडून यावेळी देण्यात आला. तसेच मोर्चा जाहीर केल्यानंतर ईडब्लूएसचा निर्णय शासनाने घेतला त्याचा फायदा समाजातील मुलांना झाला असून, नोकरी मिळाली आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा राज्यात सर्वत्र सुरू राहणार आहे. तर, मराठा आमदारांनीदेखील या मोर्चात सहभागी व्हावे आणि पक्षाच्या नावावर त्यांचे आस्तित्व संपलेले असेल तर, त्यांचा धिक्कार आहे. या सरकारला कोणत्याच समाजाचे काही पडलेले नाही. त्यामुळे विविध स्तरावरील आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याची टीकादेखील मेटे यांनी केली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील रमेश पोकळे, मनोज जरांगे, राजन घाग यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना शिष्टमंडळाने यावेळी देण्यात आले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जवळपास सर्व प्रमुख अधिकारी व ३५० पोलीस कर्मचारी शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होेते. मात्र, मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी शिस्तीचे पालन केले. परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे आयोजकांसह इतरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या...

न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळावे यासाठी कायदेशीररीत्या न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या प्रकारे प्रस्ताव तयार करून राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवावा, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, सारथी संस्था पूर्ण ताकदीने कार्यान्वित करावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात भरीव आर्थिक तरतूद करून थेट ५० हजार रुपये कर्ज द्यावे, यासह इतर मागण्यांवर शासनाने लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी यांनादेखील देण्यात आले आहे.