शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

थर्मलच्या राखेमुळे आरोग्य बिघडले, पिकांचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक ...

परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावरील दुष्परिणामानंतर थर्मलची राख शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. नवीन थर्मलमधून बाहेर पडत असलेल्या करड्या व काळसर राखेमुळे आमचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हरिष नागरगोजेसह इतर शेतकऱ्यांनी दिला आहे.

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांना विविध आजार जडले आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाच आता पिकांवर संकट आले आहे. वीज निर्मितीनंतरची राख ज्या ठिकाणी खाली करण्यात येते तेथून दिवसभर अक्षरशः धुराचे लोट निघत आहेत. या राखेमुळे आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. आमच्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच कोळसा हाताळणी विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा या भागातील शेतकऱ्यांसह औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.