शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

थर्मलच्या राखेमुळे आरोग्य बिघडले, पिकांचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक ...

परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावरील दुष्परिणामानंतर थर्मलची राख शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. नवीन थर्मलमधून बाहेर पडत असलेल्या करड्या व काळसर राखेमुळे आमचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हरिष नागरगोजेसह इतर शेतकऱ्यांनी दिला आहे.

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांना विविध आजार जडले आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाच आता पिकांवर संकट आले आहे. वीज निर्मितीनंतरची राख ज्या ठिकाणी खाली करण्यात येते तेथून दिवसभर अक्षरशः धुराचे लोट निघत आहेत. या राखेमुळे आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. आमच्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच कोळसा हाताळणी विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा या भागातील शेतकऱ्यांसह औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.