शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

माजलगाव तालुक्यात आता होणार ऊसतोड बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:54 IST

माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव द्या, या मागणीसाठी एक ते दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहे, परंतु साखर कारखानदार याला कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी थेट फडात जाऊन ऊसतोड बंद आंदोलन करण्यास सुरु वात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव द्या, या मागणीसाठी एक ते दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहे, परंतु साखर कारखानदार याला कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी थेट फडात जाऊन ऊसतोड बंद आंदोलन करण्यास सुरु वात केली आहे.

येथील बाजार समिती आवारात बोलावलेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.ऊस उत्पादक शेतकरी हे मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करीत उसाला २ हजार ६०० रूपयांप्रमाणे पहिली उचल देवून ३ हजार ५०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी करीत आहेत. मात्र या मागणीला कारखानदार कसलाच प्रतिसाद देत नाहीत. दरम्यानच्या काळात प्रशासनाने दखल घेवून बैठकीतून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखानदार हे २ हजार रुपयांच्यावर भाव द्यायला काही केल्या तयार नाहीत. त्यामुळे हा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील भावासंदर्भात वादामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार मागणी करुन देखील प्रशासन अथवा कारखानदार दखल घेत नाहीत, असे पाहून आता ऊस उत्पादक शेतकºयांनी पक्ष विरहित ऊसतोड बंदी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेवून तो लगेचच अंमलात आणण्याचे जाहीर केले.

बाजार समिती आवारात बोलावण्यात आलेल्या बैठकीला गंगाभिषण थावरे, नितीन नाईकनवरे, धम्मानंद साळवे, नारायण गोले, डॉ. उध्दव नाईकनवरे, बबनराव सोळंके, हनुमान कदम, नारायण होके, राजेंद्र होके, नाना घाटुळ, पापा सोळंके, नुमान चाऊस, राजाभाउ शेजूळ, विकास कदम, रामचंद्र डोईजड यांच्यासह विविध सामाजिक राजकीय पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकºयांचा सहभाग होता.आमदारांच्या घरावर

शुक्र वारी मोर्चाबैठकीत आमदार देशमुख यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना भाव मिळवून द्यावा, या मागणीसाठी आ.आर.टी. देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याच थावरे यांनी सांगितले.