शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रेल्वे सुरू होऊनही घाटनांदूरला थांबाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST

प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प ...

प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प होऊन कोलमडली होती. गत २२ मार्चपासून घाटनांदूर रेल्वेस्थानकावरून चालणाऱ्या सर्वच रेल्वे बंद होत्या. मागील काही दिवसांपासून काही रेल्वे सुरू झाल्या आहेत. त्या रेल्वे काऊंटरवर तिकीट विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र स्थानकावर रेल्वेच थांबत नसल्याने रेल्वे सुरू होऊनही उपयोग काय? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.

कोरोनाच्या काळात सर्वच रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून रेल्वे सेवाही पटरीवर येत आहे. घाटनांदूर रेल्वेस्थानक अतिशय सोयीचे असून व्यापाऱ्यांना खरेदीसाठी हैदराबाद, औरंगाबाद, आदी ठिकाणी जाण्यासाठी अनेक रेल्वे उपलब्ध होत्या. मात्र गत दोन वर्षांत संपूर्ण व्यवसायाची वाट लागली. आता कुठे रेल्वे सुरू झाल्या आहेत; पण सुरू झालेल्या रेल्वेंना थांबाच नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.

घाटनांदूर रेल्वेस्थानकातून हैदराबाद-पूर्णा, पूर्णा-हैदराबाद, बंगलोर-नांदेड, नांदेड -बंगलोर, औरंगाबाद -हैदराबाद, हैदराबाद-औरंगाबाद, मिरज-पंढरपूर, पंढरपूर-मिरज, निजामाबाद -पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद, निजामाबाद -पुणे, पुणे -निजामाबाद या रेल्वे बंद आहेत. या व्यतिरिक्त शिर्डी, तिरूपती, मुंबई, आदी रेल्वे धावतात. मात्र बहुसंख्य रेल्वेंना येथे थांबाच नाही. याशिवाय पॅसेंजर रेल्वे असलेल्या पूर्णा-हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या दोन रेल्वे विशेष एक्सप्रेस म्हणून परावर्तित केल्याने तिकिटांचे अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत._

....

एक्सप्रेसला थांबा नाही

घाटनांदूर येथे सर्वच रेल्वेंना थांबा मिळाल्यास किनगाव, अहमदपू, तर इकडे अंबाजोगाई, केज भागातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. कारण केज, अंबाजोगाई येथून परळीला जाण्यापेक्षा घाटनांदूर रेल्वेस्थानक सोयीचे आहे. तोच प्रकार धर्मापुरी, किनगाव, अहमदपूर प्रवाशांच्या बाबतीत आहे. त्यामुळे घाटनांदूर रेल्वेस्थानकावर पूर्वी थांबत असलेल्या रेल्वेचे थांबे कायम ठेवून एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबे देणे गरजेचे आहे.

....

आरक्षणाची व्यवस्था नाही

गत दहा वर्षांपासून येथे आरक्षण काऊंटर उघडण्याची मागणी प्रलंबित आहे. रेल्वे विभागाला शेकडो वेळा निवेदने दिली; पण आरक्षण काउंटरबाबत निर्णय घेतला गेला नाही. येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पूर्वी थांबा असलेल्या पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद, नांदेड -बंगलोर या गाड्यांचा थांबा कायम ठेवून घाटनांदूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रा. सुरेश जाधव यांनी केली आहे.

280821\img-20191207-wa0041.jpg

घाटानांदूर रेल्वे