शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

रेल्वे सुरू होऊनही घाटनांदूरला थांबाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST

प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प ...

प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प होऊन कोलमडली होती. गत २२ मार्चपासून घाटनांदूर रेल्वेस्थानकावरून चालणाऱ्या सर्वच रेल्वे बंद होत्या. मागील काही दिवसांपासून काही रेल्वे सुरू झाल्या आहेत. त्या रेल्वे काऊंटरवर तिकीट विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र स्थानकावर रेल्वेच थांबत नसल्याने रेल्वे सुरू होऊनही उपयोग काय? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.

कोरोनाच्या काळात सर्वच रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून रेल्वे सेवाही पटरीवर येत आहे. घाटनांदूर रेल्वेस्थानक अतिशय सोयीचे असून व्यापाऱ्यांना खरेदीसाठी हैदराबाद, औरंगाबाद, आदी ठिकाणी जाण्यासाठी अनेक रेल्वे उपलब्ध होत्या. मात्र गत दोन वर्षांत संपूर्ण व्यवसायाची वाट लागली. आता कुठे रेल्वे सुरू झाल्या आहेत; पण सुरू झालेल्या रेल्वेंना थांबाच नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.

घाटनांदूर रेल्वेस्थानकातून हैदराबाद-पूर्णा, पूर्णा-हैदराबाद, बंगलोर-नांदेड, नांदेड -बंगलोर, औरंगाबाद -हैदराबाद, हैदराबाद-औरंगाबाद, मिरज-पंढरपूर, पंढरपूर-मिरज, निजामाबाद -पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद, निजामाबाद -पुणे, पुणे -निजामाबाद या रेल्वे बंद आहेत. या व्यतिरिक्त शिर्डी, तिरूपती, मुंबई, आदी रेल्वे धावतात. मात्र बहुसंख्य रेल्वेंना येथे थांबाच नाही. याशिवाय पॅसेंजर रेल्वे असलेल्या पूर्णा-हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या दोन रेल्वे विशेष एक्सप्रेस म्हणून परावर्तित केल्याने तिकिटांचे अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत._

....

एक्सप्रेसला थांबा नाही

घाटनांदूर येथे सर्वच रेल्वेंना थांबा मिळाल्यास किनगाव, अहमदपू, तर इकडे अंबाजोगाई, केज भागातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. कारण केज, अंबाजोगाई येथून परळीला जाण्यापेक्षा घाटनांदूर रेल्वेस्थानक सोयीचे आहे. तोच प्रकार धर्मापुरी, किनगाव, अहमदपूर प्रवाशांच्या बाबतीत आहे. त्यामुळे घाटनांदूर रेल्वेस्थानकावर पूर्वी थांबत असलेल्या रेल्वेचे थांबे कायम ठेवून एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबे देणे गरजेचे आहे.

....

आरक्षणाची व्यवस्था नाही

गत दहा वर्षांपासून येथे आरक्षण काऊंटर उघडण्याची मागणी प्रलंबित आहे. रेल्वे विभागाला शेकडो वेळा निवेदने दिली; पण आरक्षण काउंटरबाबत निर्णय घेतला गेला नाही. येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पूर्वी थांबा असलेल्या पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद, नांदेड -बंगलोर या गाड्यांचा थांबा कायम ठेवून घाटनांदूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रा. सुरेश जाधव यांनी केली आहे.

280821\img-20191207-wa0041.jpg

घाटानांदूर रेल्वे