शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रेल्वे सुरू होऊनही घाटनांदूरला थांबाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST

प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प ...

प्रवाशांची गैरसोय : थांबा देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटनांदूर : कोरोनाच्या काळात दळणवळणासह सर्वच यंत्रणा ठप्प होऊन कोलमडली होती. गत २२ मार्चपासून घाटनांदूर रेल्वेस्थानकावरून चालणाऱ्या सर्वच रेल्वे बंद होत्या. मागील काही दिवसांपासून काही रेल्वे सुरू झाल्या आहेत. त्या रेल्वे काऊंटरवर तिकीट विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र स्थानकावर रेल्वेच थांबत नसल्याने रेल्वे सुरू होऊनही उपयोग काय? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.

कोरोनाच्या काळात सर्वच रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून रेल्वे सेवाही पटरीवर येत आहे. घाटनांदूर रेल्वेस्थानक अतिशय सोयीचे असून व्यापाऱ्यांना खरेदीसाठी हैदराबाद, औरंगाबाद, आदी ठिकाणी जाण्यासाठी अनेक रेल्वे उपलब्ध होत्या. मात्र गत दोन वर्षांत संपूर्ण व्यवसायाची वाट लागली. आता कुठे रेल्वे सुरू झाल्या आहेत; पण सुरू झालेल्या रेल्वेंना थांबाच नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.

घाटनांदूर रेल्वेस्थानकातून हैदराबाद-पूर्णा, पूर्णा-हैदराबाद, बंगलोर-नांदेड, नांदेड -बंगलोर, औरंगाबाद -हैदराबाद, हैदराबाद-औरंगाबाद, मिरज-पंढरपूर, पंढरपूर-मिरज, निजामाबाद -पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद, निजामाबाद -पुणे, पुणे -निजामाबाद या रेल्वे बंद आहेत. या व्यतिरिक्त शिर्डी, तिरूपती, मुंबई, आदी रेल्वे धावतात. मात्र बहुसंख्य रेल्वेंना येथे थांबाच नाही. याशिवाय पॅसेंजर रेल्वे असलेल्या पूर्णा-हैदराबाद, हैदराबाद -औरंगाबाद या दोन रेल्वे विशेष एक्सप्रेस म्हणून परावर्तित केल्याने तिकिटांचे अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत._

....

एक्सप्रेसला थांबा नाही

घाटनांदूर येथे सर्वच रेल्वेंना थांबा मिळाल्यास किनगाव, अहमदपू, तर इकडे अंबाजोगाई, केज भागातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. कारण केज, अंबाजोगाई येथून परळीला जाण्यापेक्षा घाटनांदूर रेल्वेस्थानक सोयीचे आहे. तोच प्रकार धर्मापुरी, किनगाव, अहमदपूर प्रवाशांच्या बाबतीत आहे. त्यामुळे घाटनांदूर रेल्वेस्थानकावर पूर्वी थांबत असलेल्या रेल्वेचे थांबे कायम ठेवून एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबे देणे गरजेचे आहे.

....

आरक्षणाची व्यवस्था नाही

गत दहा वर्षांपासून येथे आरक्षण काऊंटर उघडण्याची मागणी प्रलंबित आहे. रेल्वे विभागाला शेकडो वेळा निवेदने दिली; पण आरक्षण काउंटरबाबत निर्णय घेतला गेला नाही. येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पूर्वी थांबा असलेल्या पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद, नांदेड -बंगलोर या गाड्यांचा थांबा कायम ठेवून घाटनांदूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रा. सुरेश जाधव यांनी केली आहे.

280821\img-20191207-wa0041.jpg

घाटानांदूर रेल्वे