शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ई-पाससाठी दोनच कारणे, एक नातेवाईकांचा मृत्यू, दुसरे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:27 IST

बीड : जिल्ह्याच्या बाहेर व जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. मागील ६ दिवसांपासून पोलीस ...

बीड : जिल्ह्याच्या बाहेर व जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. मागील ६ दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडे जवळपास ८ हजार ५०० अर्ज जणांनी ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केले होते. यातील प्रवासाची कारणे तपासून त्यांना परवानगी दिली जात असून, यातील मोठ्या प्रमाणात अर्जदार हे रुग्णालयात दाखवण्यासाठी व नातेवाईकांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी जाणारे आहेत. त्यांना पासची पूर्तता करण्यासाठी बीड सायबर विभागास २४ तास कार्यरत आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध प्रवासाच्या संदर्भात घातले आहेत. दरम्यान २६ एप्रिल पासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच, तरच पोलीस प्रशासनाच्या सायबर विभागातून प्रवास पास दिला जात आहे. यामध्ये नातेवाईकांचा मृत्यू त्यांच्या अंत्यविधीसाठी जायचे आहे. तसेच रुग्णालयात उपचारासाठी व लग्नासाठी प्रवास ही प्रमुख कारणे अर्जावर असतात. आतापर्यंत ८ हजार ५०० अर्जापैकी सायबर पोलिसांनी छाननी करून त्यातील २ हजार जणांना ई-पास दिले आहेत. तर, दररोज येणारे अर्ज त्याच दिवशी निकाली काढण्यावर सायबर विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण देखील कमी आहे. प्रवासासाठी अत्यावश्यक कारण नसणे, गरजेचे कागपत्र जोडलेले नसल्यास अर्ज नामंजूर केले जात आहे.

ई-पाससाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत

ई-पाससाठी पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी अत्यावश्यक कारण काय आहे हे नमुद करत नाहीत. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे कारण योग्य दिले व आवश्यक ती कागपत्रे अपलोड केल्यास सायब विभागाकडून परवानगी दिली जाते.

असा करावा ई-पाससाठी अर्ज

https://covid19.mahapolice.in या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामासाठी प्रवास करायचा आहे. त्या कामाच्या संदर्भातील कागपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. माहिती कागपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदारास संकेतिक क्रमांक प्राप्त होते. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास हा ई-पास परवानगी दिली असेल तर डाऊनलोड करून घेता येतो.

दोन तासाच्या आत पास देण्याचा प्रयत्न

नागरिकांनी ई-पास देण्याची जबाबदारी सायबर विभागाकडे आहे. त्याठिकाणी दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ते दिवस रात्र काम करून अर्जाची तपासणी करून परवानगी देतात. त्यामुळे रोज आलेले पास रोज वितरीत करण्यावर भर आहे. तसेच पास आल्यानंतर दोन तासाच्या आत संबंधितांना मिळावा यासाठी प्रयत्न केला जातात, अशी माहिती सायबर विभाग प्रमुख पोलीस निरिक्षक आर.एस गायकवाड यांनी दिली.