शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ई-पाससाठी दोनच कारणे, एक नातेवाईकांचा मृत्यू, दुसरे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:27 IST

बीड : जिल्ह्याच्या बाहेर व जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. मागील ६ दिवसांपासून पोलीस ...

बीड : जिल्ह्याच्या बाहेर व जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. मागील ६ दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडे जवळपास ८ हजार ५०० अर्ज जणांनी ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केले होते. यातील प्रवासाची कारणे तपासून त्यांना परवानगी दिली जात असून, यातील मोठ्या प्रमाणात अर्जदार हे रुग्णालयात दाखवण्यासाठी व नातेवाईकांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी जाणारे आहेत. त्यांना पासची पूर्तता करण्यासाठी बीड सायबर विभागास २४ तास कार्यरत आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध प्रवासाच्या संदर्भात घातले आहेत. दरम्यान २६ एप्रिल पासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच, तरच पोलीस प्रशासनाच्या सायबर विभागातून प्रवास पास दिला जात आहे. यामध्ये नातेवाईकांचा मृत्यू त्यांच्या अंत्यविधीसाठी जायचे आहे. तसेच रुग्णालयात उपचारासाठी व लग्नासाठी प्रवास ही प्रमुख कारणे अर्जावर असतात. आतापर्यंत ८ हजार ५०० अर्जापैकी सायबर पोलिसांनी छाननी करून त्यातील २ हजार जणांना ई-पास दिले आहेत. तर, दररोज येणारे अर्ज त्याच दिवशी निकाली काढण्यावर सायबर विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण देखील कमी आहे. प्रवासासाठी अत्यावश्यक कारण नसणे, गरजेचे कागपत्र जोडलेले नसल्यास अर्ज नामंजूर केले जात आहे.

ई-पाससाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत

ई-पाससाठी पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी अत्यावश्यक कारण काय आहे हे नमुद करत नाहीत. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे कारण योग्य दिले व आवश्यक ती कागपत्रे अपलोड केल्यास सायब विभागाकडून परवानगी दिली जाते.

असा करावा ई-पाससाठी अर्ज

https://covid19.mahapolice.in या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामासाठी प्रवास करायचा आहे. त्या कामाच्या संदर्भातील कागपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. माहिती कागपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदारास संकेतिक क्रमांक प्राप्त होते. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास हा ई-पास परवानगी दिली असेल तर डाऊनलोड करून घेता येतो.

दोन तासाच्या आत पास देण्याचा प्रयत्न

नागरिकांनी ई-पास देण्याची जबाबदारी सायबर विभागाकडे आहे. त्याठिकाणी दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ते दिवस रात्र काम करून अर्जाची तपासणी करून परवानगी देतात. त्यामुळे रोज आलेले पास रोज वितरीत करण्यावर भर आहे. तसेच पास आल्यानंतर दोन तासाच्या आत संबंधितांना मिळावा यासाठी प्रयत्न केला जातात, अशी माहिती सायबर विभाग प्रमुख पोलीस निरिक्षक आर.एस गायकवाड यांनी दिली.