शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या निविदेला अखेर मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील नगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या निविदेला अखेर २८ डिसेंबर रोजी स्थायी समितीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : येथील नगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या निविदेला अखेर २८ डिसेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. गत तीन ते चार वर्षांत अनेकजण जेलवारी भोगत असतानाही नगर पालिकेतील कामात अनियमितता सुरूच असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

माजलगाव नगरपालिकेला तत्कालिन राज्य सरकारने करोडो रुपयांचा निधी दिला होता. यातील काही निधी तत्कालिन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी नियमबाह्य खर्च केला होता. त्यामुळे तत्कालिन तीन मुख्याधिकाऱ्यांसह चार लेखापालांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तीन महिन्यांपेक्षा अधिककाळ नगराध्यक्ष गैरहजर राहिल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपालिका आपल्या ताब्यात यावी, यासाठी चक्क तबेला गाठत तत्कालिन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा पाठिंबा मिळवला होता. आमदार सोळंके हे सातत्याने चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. मात्र, असे असताना आमदार सोळंके यांनी पालिका ताब्यात घेण्यासाठी चाऊस यांच्याशी दिलजमाई केल्याने शहरात वेगळीच चर्चा सुरू झाली होती. नगराध्यक्षपदी आमदार सोळंके यांनी शेख मंजूर यांना विराजमान करत आपण भ्रष्टाचारमुक्त कारभार करून दर्जेदार विकासकामे राबविणार असल्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते. दोन महिन्यांपूर्वी शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा या दोन कामांची निविदा काढण्यात आली होती. या कामांना सर्वसाधारण सभा व स्थायी समितीची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता चक्क नियम धाब्यावर बसवून संबंधित निविदाधारकांमार्फत थातूर-मातूर पध्दतीने काम सुरू केले. यातून कामे न करताच लाखो रूपये ठेकेदारांच्या घशात घालण्याचे काम पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच २८ डिसेंबर रोजी नगरपालिका सभागृहात स्थायी समितीची बैठक घेत स्वच्छता व पाणीपुरवठा कामी काढलेल्या निविदेला अधिकृत मान्यता देण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा हा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असाच ठरत आहे. यातून मागील चार वर्षांचा कारभार ज्याप्रमाणे नियमाबाह्य राहिला, त्याचप्रमाणे आमदार सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पहिले पाढे पंचावन्नप्रमाणे गिरवून नियमबाह्य कारभाराची मालिका कायम ठेवली आहे. माजलगांव पालिकेच्या या अनागोंदी कारभाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.