शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आष्टीत उन्हाचा कडाका वाढला, तापमान ३८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST

आष्टी : तालुक्यात कोरोना या महाभयंकर विषाणूने हैराण करून सोडलेले असतानाच आता सूर्यनारायणाने उग्र रूप धारण ...

आष्टी : तालुक्यात कोरोना या महाभयंकर विषाणूने हैराण करून सोडलेले असतानाच आता सूर्यनारायणाने उग्र रूप धारण केले आहे. उन्हाचा पारा वाढल्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू आहेत. शेतकरी, शेतमजूर उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी ६ वाजताच तर सायंकाळी ४ नंतर शेतीकामाला प्राधान्य देत आहेत.

उन्हाचा पारा चढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील काही दिवस तापमानात सतत वाढ होत आहे. त्यातच विजेचा अधून मधून लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रासले आहेत. दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हात नागरिक घराच्या बाहेर न पडता घरामध्ये फॅन व कूलरची हवा घेत आहेत. मागील १० दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दुपारी १२ ते ३.३० च्या कालावधीत ३८ ते ४० तापमान नोंदले जात आहे.

शेतकऱ्यांची शेतीची उन्हाळी कामे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांनी आता रबी पिकांची काढणी, मळणी केली असून आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत सुरू असून उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेताची नांगरट करून जूनमध्ये खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतात. अशातच आता कडाक्याची उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतकरी अथवा शेतमजूर सायंकाळी व सकाळी कामाला प्राधान्य देत आहेत. काही शेतकरी सकाळी ६ लाच काम सुरू करून १० ते ११ वाजेपर्यंत काम संपवतात. परत सायंकाळी कामाला प्राधान्य देत आहेत. यातच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी केली असून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सवलत दिली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी गर्दीदेखील आता कमी झाली आहे. उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.