शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, कसं होणार पोषण; एक लाखांपैकी ५१ हजार क्षयरोग्यांना मिळेना भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक व आरोग्यासाठी लाभदायक आहार घेता यावा, यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिलांना पोषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक व आरोग्यासाठी लाभदायक आहार घेता यावा, यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिलांना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. परंतु सध्या ॲक्टिव्ह असलेल्या १ लाख ३९२ रुग्णांपैकी केवळ ४९ हजार रुग्णांनाच भत्ता देण्यात आला आहे. अद्यापही ५१ हजार २९९ रुग्णांना भत्ता मिळालेला नाही. यातील ३० हजार रुग्णांनी खाते क्रमांकच दिलेला नाही. भत्ताच मिळाला नाही, तर पोषण कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य आजार आहे. फुफ्फूस व त्याव्यतिरिक्त इतर अवयवांना होणारा टीबी असे दोन प्रकार आहेत. खोकला, थुंकी व शिंकण्यातून तो जास्त प्रमाणात पसरतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, बेडक्यातून रक्त पडणे, सायंकाळी येणारा ताप ही टीबीची प्रमुख लक्षणे आहेत. एखादा रुग्ण टीबीमुक्त होण्यासाठी कमीत कमी ६ महिने कालावधी लागतो, तर औषधाला दाद न देणाऱ्या रुग्णाला टीबीमुक्त होण्यासाठी ९ ते २८ महिन्यांचा कालावधी लागतो. या काळात त्यांना आहार चांगला घेता यावा, यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना ५०० रुपये भत्ता दिला जातो. यासाठी निक्षय पोषण योजना आहे. परंतु रुग्णांकडून वेळेवर माहिती न देणे आणि कार्यालयांकडून उशिरा खाते क्रमांक अपलोड केल्याने रुग्णांना वेळेवर भत्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. हा भत्ता १०० टक्के देऊन रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

....

कोल्हापूर आघाडीवर, तर औरंगाबाद तळाला

राज्याचा आढावा घेतला असता, रुग्णांना भत्ता देण्यात कोल्हापूर मंडळ आघाडीवर आहे. या मंडळात एकूण रुग्णांपैकी ६८ टक्के रुग्णांना भत्ता दिला आहे. त्यापाठोपाठ अकोला व मुंबई मंडळ ५० टक्के, लातूर ५७ टक्के, नागपूर ५६ टक्के, पुणे ५२ टक्के यांचा क्रमांक लागतो. औरंगाबाद मंडळ सर्वात तळाला असून केवळ ४६ टक्के रुग्णांना आतापर्यंत भत्ता देण्यात आला आहे.

...

भत्ता देण्यात बीड जिल्हा राज्यात दि्वतीय

क्षयरोग्यांना भत्ता देण्यात बीड जिल्हा कोल्हापूरनंतर दुसऱ्यास्थानी आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह ८९९ रुग्णांपैकी ६९८ जणांना भत्ता दिला आहे. याचा टक्का ७८ आहे. २०२१ या वर्षात आतापर्यंत १५ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा निधी वाटप झाला आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी ही माहिती दिली, तर सर्वात कमी काम हे ठाणे महापालिकेचे (केवळ १८ टक्के) आहे.

---

आमच्याकडून रुग्ण शोधताच त्याची पूर्ण माहिती घेतली जाते. त्याला पोषण आहार भत्ता देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेचा खाते क्रमांक घेण्यासह प्रत्येक महिन्याला बोलावून घेत उपचार केले जातात. चालू वर्षात १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी वाटप केला आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन नोंद आहे.

- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड.