शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

प्रभात बुडूख/ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. सुरुवातील ...

प्रभात बुडूख/

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. सुरुवातील चांगला पाऊस झाला आणि हवामान खात्याने देखील चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पहिल्या एक, दोन पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी व कापूस लागवड केली आहे. आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४७ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी जवळपास ६ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. हवामान खात्याचा अंदाज होता. यावर्षी चांगला पाऊस पडेल. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडलेल्या पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. जवळपास सर्वच तालुक्यात शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, मागील आठ दिवसात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे काही तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. यावर्षी कापूस पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. तर, सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे, त्यामुळे या काळात सोयाबीनसह उडीद, मूग, बाजरी तूर या पिकांना पावसाची आवश्यकता आहे.

मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे चांगला पाऊस असताना देखील अनेक भागात उगवले नव्हते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले होते. दरम्यान, यावर्षी पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अनेक अडचणींमध्ये असेलल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे. दुबार पेरणी करावी लागली तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे वरूणराजाची प्रतीक्षा करीत आहे.

...

जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत झालेली पेरणी - ६ लाख ४८ हजार हेक्टर

अपेक्षित पाऊस सरासरी १४८.१ मिमी

झालेला पाऊस सरासरी १९०.१ मिमी

...

....तर दुबार पेरणी

खरीप हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची पुढील सर्व आर्थिक गणिते अवलंबून असतात. दरम्यान, यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापूस यासह इतर खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन व्हावा यासाठी शेतकरी बांधवांनी पोटेशियम नायट्रेटची कृषी सहायकाच्या मार्गदर्शनाने फवारणी कारावी. पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडे आहे, त्यांनी स्प्रिंकलरने पिकांना पाणी द्यावे. कृषी सहायकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड.

,...

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

मागील वर्षी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्यामुळे दुबार पेरणीचा खर्च वाढला होता. त्याच पद्धतीने जर यावर्षी देखील दुबार पेरणीचे संकट आमच्यावर आले तर आर्थिक संकट येणार आहे. तसे झाल्यास शासनाकडून रेशनप्रमाणे खते आणि बियाणे मोफत द्यावे, अशी मागणी करावी लागणार आहे.

-सतीष जगताप, शेतकरी.

...

जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित पिकांचा पंचनामा कृषी व महसूल यांनी केला होता. त्याप्रमाणे विमा देण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे. ती विम्याची रक्कम जर शेतकऱ्यांना मिळाली तर या परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे विमा रक्कम तत्काळ देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीड जिल्हाध्यक्ष.

....

सोयाबीनचा पेरा वाढला

दरवर्षी जिल्ह्यातील कापूस या पिकाची लागवड सर्वाधिक असते. मात्र, खर्चाच्या तुलनेत भाव कमी भेटत असल्यामुळे कापसाचे क्षेत्र घटले आहे. तर सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यावर्षी कापूस २ लाख २० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली तर, सोयाबीन २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

...

कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका पाऊस पेरणी

मिमी (हेक्टर)

बीड १०८.६ ९४५५३

पाटोदा १४६ ५७५६५

आष्टी १३३.७ ६७३४०

शिरूर १४२ ४०५७३

माजलगाव २७५.७ ५१४९६

गेवराई १८८.९ ८२६३१

धारूर १८० ३८१९३

वडवणी २१७ २४०२१

अंबाजोगाई २७५ ५८६०५

केज १७३ ८५७९७

परळी २५५.६ ४६४२१

030721\03_2_bed_18_03072021_14.jpg

पावसाने ओढ दिल्याने तुषार सिंचनद्वारे पाणी देण्यास सुरुवात