शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा- प्राची कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:14 IST

बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर ...

ठळक मुद्देवडगाव गुंदा येथे विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रम

बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी योजनांची माहिती घ्यावी व योजनेस पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची प्र. कुलकर्णी यांनी वडगाव गुंदा येथे आयोजित महाशिबीरात केले.बीड तालुक्यातील वडगाव गुंदा येथे बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकारणाच्यावतीने महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सदस्य सचिव डी.एन. खडसे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.अजय राख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण राख, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अधिक्षिका उषा रुपदे, सरपंच पंचशिला डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.नितीन वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संगिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, डॉ.सुनील भोकरे, उदयसिंह सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हारिदास, उपसरपंच महादेव नागरगोजे, सचिन डोंगरदिवे, अभिमान डोंगरदिवे, अंकुश डोंगरदिवे, द्रोपदी नागरगोजे, सरस्वती लांब, बाबासाहेब नागरगोजे, कमलाबाई नागरगोजे, दादाहरी नागरगोजे, महादेव खेडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, नागरिकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या अधिकाºयांची मदत घेतली पाहिजे. गावात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी दरमहा ग्रामसभा घेवून त्या सोडविल्या पाहिजेत, असे सांगितले.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले की, शासन योजनांचा लाभ घ्यावा. प्रत्येक नागरिकांनी कोणतेही काम करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगितले. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.