शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा सोबती बनला ‘स्वाध्याय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने राज्य शासनाने राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ...

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने राज्य शासनाने राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’ (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रम सुरू केला. या उपक्रमात बीड जिल्हा राज्यात १४व्या स्थानी आहे. जिल्ह्यातील एक लाख १५ हजार ९०२ विद्यार्थी स्वाध्याय सोडवत असून, बहुपर्यायी उत्तरांमुळे या प्रश्नमंजूषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण वाढले आहे.

या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर 'क्विझ' (प्रश्नमंजूषा) पाठविण्यात येते. त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्य:स्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतात.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानवाढीसाठी शासनाचा व्हाॅट्सॲप आधारित सराव हा अभिनव उपक्रम असून, राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेच्या प्रयत्नांना चांगले यश आल्याचे दिसते.

फोनवर प्रश्नमंजूषा व त्याची उत्तरे सोडविताना विद्यार्थ्यांना उत्सुकता असते त्याचबरोबर दिलेल्या उत्तराची पडताळणी करताना कुतूहलही असते. कोरोनाकाळात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास सुरू आहे.

एकूण विद्यार्थी : ५, १३, ५८०

स्वाध्यायसाठी जिल्ह्यात नोंदणी केलेले विद्यार्थी : १,५२,५९४

मराठी : १३,९१७

इंग्रजी : २४,०६०

उर्दू : १४,०७७

एकूण : १,५२,५९४

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी : १,४८,८९६

मराठी : १११६४७

इंग्रजी : २३४०३

उर्दू : १३८४६

एकूण : १,४८, ८९६

--------

सुलभ आणि सोपे स्वाध्याय

यामध्ये मराठी, गणित व विज्ञान या विषयांचे स्वाध्याय दर शनिवार, रविवारी व्हाॅट‌्सॲपवर सराव म्हणून सोडवण्यासाठी येतात. हे स्वाध्याय सोडवल्यानंतर लगेच किती मार्क पडले ते कळते व त्याबाबतची उत्तरसूचीसुद्धा मेसेजद्वारे येते, जर कमी मार्क पडले असतील तर त्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती असलेला दीक्षा ॲपवरील व्हिडिओची लिंक दिलेली असते. त्यामुळे तो व्हिडिओ पाहून पुन्हा त्या विषयाचा सखोल अभ्यास होतो.

------------

स्वाध्याय उपक्रम हा अतिशय चांगला उपक्रम आहे. मला यामुळे या उपक्रमाबाबत खूप आवड निर्माण झाली आहे, तसेच मी दर आठवड्याला या स्वाध्यायाची आतुरतेने वाट पाहत असते. उत्तरसूची मिळते, त्यामुळे कमी मार्क कोणत्या प्रश्नाला पडले व त्याचे उत्तर काय हे कळते.

यशश्री राहुल चाटे, इयत्ता चौथी

---------

स्वाध्याय उपक्रम मला सुरुवातीपासूनच आवडतो. सराव होतो. आनंद वाटतो. प्रश्न आल्यानंतर लगेच सोडविण्यासठी माझी तयारी असते. उत्तरांचे पर्याय असतात. कोडे सोडविल्यासारखे ते मी सोडवतो. कुठे चुकले ते उत्तरसूचीमुळे समजते. - समर्थ भगीरथ करपे, इयत्ता सातवी, जिल्हा परिषद प्र. शाळा कुमशी, ता. जि. बीड.

----------

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद सीईओंच्या मार्गदर्शनात स्वाध्याय उपक्रम राबविला जात आहे. शिक्षकांकडून चांगले योगदान मिळत असल्याने सध्या बीड जिल्हा चौदाव्या स्थानी आहे. २५ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक होऊन प्रत्येक पालकांपर्यंत स्वाध्याय पोहोचविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पहिला यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - जयपाल कांबळे, प्रभारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई.

------------

===Photopath===

300321\30bed_5_30032021_14.jpg~300321\30bed_6_30032021_14.jpg

===Caption===

यशश्री चाटे~समर्थ करपे