शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची आक्रोश पदयात्रा आज बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने ...

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने तत्काळ मदत म्हणून द्यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडवणी तालुक्यातून बीडपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी आक्रोश पदयात्रा बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.

चिंचोटी येथून निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच छोटे मोठे नदी, नाले, ओढे ,बंधारे तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटून वाहिल्याने शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली आहे. तसेच शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, यासह इतर मागण्यांसाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे. या पदयात्रेत वडवणी तालुकाध्यक्ष अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

शेतकऱ्यांना समस्यांमधून मुक्त करा

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला आहे. त्यामुळे मराठवाडा ज्याप्रमाणे जुलमी राजवटीतून मुक्त झाला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व इतर मागण्या पूर्ण करून त्यांचीदेखील या जुलमातून सुटका करावी, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सांगितले.

160921\16_2_bed_10_16092021_14.jpg

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश यात्रा काढण्यात आली यावेळी पूल नसल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातून वाट काढली