शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

‘स्वाभिमानी’ची आक्रोश पदयात्रा आज बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने ...

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने तत्काळ मदत म्हणून द्यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडवणी तालुक्यातून बीडपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी आक्रोश पदयात्रा बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.

चिंचोटी येथून निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच छोटे मोठे नदी, नाले, ओढे ,बंधारे तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटून वाहिल्याने शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली आहे. तसेच शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, यासह इतर मागण्यांसाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे. या पदयात्रेत वडवणी तालुकाध्यक्ष अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

शेतकऱ्यांना समस्यांमधून मुक्त करा

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला आहे. त्यामुळे मराठवाडा ज्याप्रमाणे जुलमी राजवटीतून मुक्त झाला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व इतर मागण्या पूर्ण करून त्यांचीदेखील या जुलमातून सुटका करावी, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सांगितले.

160921\16_2_bed_10_16092021_14.jpg

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश यात्रा काढण्यात आली यावेळी पूल नसल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातून वाट काढली