शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘स्वाभिमानी’ची आक्रोश पदयात्रा आज बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने ...

बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने तत्काळ मदत म्हणून द्यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडवणी तालुक्यातून बीडपर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी आक्रोश पदयात्रा बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.

चिंचोटी येथून निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच छोटे मोठे नदी, नाले, ओढे ,बंधारे तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटून वाहिल्याने शेतकऱ्यांची शेती पिकांसह वाहून गेली आहे. तसेच शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, यासह इतर मागण्यांसाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे. या पदयात्रेत वडवणी तालुकाध्यक्ष अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

शेतकऱ्यांना समस्यांमधून मुक्त करा

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला आहे. त्यामुळे मराठवाडा ज्याप्रमाणे जुलमी राजवटीतून मुक्त झाला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व इतर मागण्या पूर्ण करून त्यांचीदेखील या जुलमातून सुटका करावी, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सांगितले.

160921\16_2_bed_10_16092021_14.jpg

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश यात्रा काढण्यात आली यावेळी पूल नसल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातून वाट काढली