शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:03 IST

माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर । मला निवडून द्या अन् माझ्याकडून ५ वर्षे हक्काने सेवा करवून घ्या

बीड : बौध्द समाजाने दिलेला शब्द काळया दगडावरची रेघ आहे. माझे म्हणने पटत असेल तर साथ द्या, तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दिलीप गोरे, अशोक कांबळे, नाना मस्के, आशिष चव्हाण, न.से.संजय होळकर, सचिन सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्र माचे अध्यक्ष प्रकाश वडमारे हे होते.याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या उषा सरवदे म्हणाल्या की, बीड मतदार संघात आण्णा हेच पक्ष मानून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबा आणि गोरगरीबांची, दलित पीडितांची सेवा करणाऱ्या जयदत्तअण्णांना विधानसभेत पाठवा. याप्रसंगी रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण, अशोक कांबळे म्हणाले की, काकू-आण्णा-डॉ.भारतभूषण हे गोरगरीबांचे बीडमधील तारणहार आहेत. त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दिलीप भोसले यांनी केले. याप्रसंगी अमोल पौळ, अमोल अहिरे, संगीता गायकवाड, बाळासाहेब काकडे, प्रियंका कामटे, राम हिरवे, कौशल्या गायकवाड, बबिता वडमारे, कमल पेठे, बबिता जावळे, जयश्री गवळी, कांता सरवदे, दिपा वंजारे, ईश्वरी धन्वे आदींसह पुरूष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठीजयदत्तआण्णा म्हणाले की, सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी असते. दुष्काळ हा भूतकाळ करावयाचा आहे. मलमपट्टया करून भागत नाही त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून समुद्राला वाहून जाणारे ६०० टी.एम.सी. पाणी मराठवाड्यातील ११ मोठ्या तलावात सोडून पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणार. २०२२ पर्यंत एकही बेघर राहणार नाही. निराधारांना आधार, आंधळ्याची काठी, महिला सक्षमीकरण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्राधान्याने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर