शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:03 IST

माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर । मला निवडून द्या अन् माझ्याकडून ५ वर्षे हक्काने सेवा करवून घ्या

बीड : बौध्द समाजाने दिलेला शब्द काळया दगडावरची रेघ आहे. माझे म्हणने पटत असेल तर साथ द्या, तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दिलीप गोरे, अशोक कांबळे, नाना मस्के, आशिष चव्हाण, न.से.संजय होळकर, सचिन सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्र माचे अध्यक्ष प्रकाश वडमारे हे होते.याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या उषा सरवदे म्हणाल्या की, बीड मतदार संघात आण्णा हेच पक्ष मानून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबा आणि गोरगरीबांची, दलित पीडितांची सेवा करणाऱ्या जयदत्तअण्णांना विधानसभेत पाठवा. याप्रसंगी रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण, अशोक कांबळे म्हणाले की, काकू-आण्णा-डॉ.भारतभूषण हे गोरगरीबांचे बीडमधील तारणहार आहेत. त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दिलीप भोसले यांनी केले. याप्रसंगी अमोल पौळ, अमोल अहिरे, संगीता गायकवाड, बाळासाहेब काकडे, प्रियंका कामटे, राम हिरवे, कौशल्या गायकवाड, बबिता वडमारे, कमल पेठे, बबिता जावळे, जयश्री गवळी, कांता सरवदे, दिपा वंजारे, ईश्वरी धन्वे आदींसह पुरूष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठीजयदत्तआण्णा म्हणाले की, सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी असते. दुष्काळ हा भूतकाळ करावयाचा आहे. मलमपट्टया करून भागत नाही त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून समुद्राला वाहून जाणारे ६०० टी.एम.सी. पाणी मराठवाड्यातील ११ मोठ्या तलावात सोडून पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणार. २०२२ पर्यंत एकही बेघर राहणार नाही. निराधारांना आधार, आंधळ्याची काठी, महिला सक्षमीकरण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्राधान्याने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर