शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आगामी पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ द्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:04 IST

गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसारग यांचे प्रतिपादन । मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंझेरी फाटा ते कर्झणी रस्त्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

बीड : तुमचं आमचं विकासाचं नातं रक्तापेक्षा मजबूत आहे. समोरच्या माणसाची उंची किती आहे, त्यांनी कोणती कामे केली हे तपासले पाहिजे. सर्वांना सोबत घेवून भेडसावणारे प्रश्न कोण सोडवितो हे पाहिले पाहिजे. गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. आता चिन्ह बदलले असून प्रत्येक घरोघरी जावून धनुष्यबाणाचे चिन्ह समजावून सांगावे. मी आता शिवधनुष्य हाती घेतले आहे, सर्वांनी सहकार्य करून ताकत द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंझेरी फाटा ते कर्झणी रस्त्याचे उद्घाटन जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, राणा डोईफोडे, गोरख शिंगण, रतन गुजर हे उपस्थित होते.क्षीरसागर म्हणाले की, या भागात नॅशनल हायवे २११ ते कर्झणी या रस्त्याचे उद्घाटन झाले असून त्याचे काम लवकरच सुरू होऊन वाहतूक सुरळीत होईल. रस्त्याच्या जोडणीबरोबरच मतांची जोडणी करावयाची आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडले असून कर्झणीच्या तलावात तीस ते चाळीस टक्के पाणी आहे. येथे अनेक विकासाची कामे झाली असून या पुढेही गावाला कोठेही कमी पडू दिले जाणार नाही. आतापर्यत सुविधा आणि गरजा पूर्ण करण्याचे काम केले. रेशनकार्ड, गॅस कनेक्शन आदी योजना राबवून श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन आता सहाशे ऐवजी एक हजार रुपए एवढे वाढविले असून जे घटक परिघाबाहेर आहेत त्यांचा कसा फायदा होईल यासाठी सरकारच्या माध्यमातून काम करीत आहोत. कोणी कोठेही असले तरी ते मनाने आपल्याबरोबर आहेत. मंत्रीपदाचा आणि संधीचा वापर विकासासाठी केला. मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून समुद्राला वाहून जाणारे ६०० टि.एम.सी पाणी मराठवाड्यात वळविल्यानंतर येथील जनता कधीही विसणार नाही. ३० हजार कोटींच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे ते म्हणाले.कुंडलिक खांडे म्हणाले, क्षीरसागर यांची ताकत जिह्यातच नव्हे तर राज्यातही आहे. कर्झणीकरांनी एकमुखी मतदान केले पाहिजे. त्यांना राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून ताकत उभी करावी. ही निवडणूक स्वत:ची समजून जोमाने कामाला लागावे असे ते म्हणाले.सचिन मुळूक, राणा डोईफोडे, गोरख शिंगण यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, अरूण बोंगाणे, सर्जेराव शिंदे, शुभम कातांगळे, सर्जेराव खटाणे, शिवानंद कदम, सदाशिव सुर्वे, देवीदास डांगे, मंदाबाई खटाणे, शहादेव डांगे, विठ्ठल साबळे, राजाभाऊ खुरणे, पठाण अहमद, अन्साराम मोरे, सुनील साबळे, दिलीप डोळे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना