शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विकास, परिवर्तनासाठी साथ द्या- क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:20 IST

विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्ट्या काढत बसू नयेत, विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभेच्या निवडणुकीत ढेकनमोहा परिसर मोठ्या ताकतीने युतीच्या मागे उभा राहिला होता. आता विधानसभेला ही तितक्याच ताकदीने उभे रहा. परिवर्तनासाठी ताकतीने साथ द्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेची आहेत. आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडले आहे, असे सांगून विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्ट्या काढत बसू नयेत, विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामांच्या आणि गोरक्षनाथ टेकडी येथील रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी १७ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते आज झाला. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी, ढेकणमोहा येथे झालेल्या या भूमिपूजन समारंभास गोरक्षनाथ टेकडी देवस्थानचे ह.भ.प. नवनाथ महाराज, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळक, जगदीश काळे, अरूण डाके, विलास बडगे, दिलीप गोरे, दिनकर कदम, गणपत डोईफोडे उपस्थित होते.भूमीपूजनांनंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आम्ही बिघडलेले घड्याळ काढून धनुष्य हाती घेतले आहे, स्व बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि माझे सहकारी माझ्याबरोबर समर्थपणे साथीला आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणुकित युतीला चांगले मतदान ढेकनमोहा परिसरातून मिळाले त्यापेक्षाही अधिक मतदान आता विधानसभेला मिळणार आहे, असा मला ठाम विश्वास आहे. पुढच्या पिढीसाठी विकास कामे महत्वाची आहेत, दिलेला शब्द आज पूर्ण करतोय.गोरक्षनाथ टेकडीच्या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी टाकला आहे, पुढचा टप्पा पूर्ण रस्ते करून घेण्यासाठी राहील, योजना आणण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, युतीचे सरकार जनतेच्या भल्याचे सरकार आहे हे ओळखून घ्या, बीड-गेवराई मार्गाच्या जमिनीचा मावेजा जसा मिळवून दिला तसा बीड ते परळी मार्गाचा मावेजा देखील मिळवून देऊत, आम्ही घोषणा करत नाहीत तर त्या पूर्णच करतो.दुष्काळी मराठवाडा पाण्याच्या प्रश्नाने चिंतेत आहे ही चिंता मिटवण्यासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे, डीपीआरचे काम अंतिम टप्यात आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या विनाअट मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत, मागेल त्याला शेततळे दिले जाईल, असेही क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ढेकणमोहा -कराळवाडी- निर्मळवाडी या ६.९० किलोमीटर लांबीच्या व ३ कोटी ९९ लक्ष रु पयांच्या कामाचे भूमिपूजन करून आश्वासन पाळले.तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे १८ लक्ष रु पये खर्चाच्या बीड परळी मार्ग ते गोरक्षनाथ टेकडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक