शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी येथे शेतकऱ्यांनी मावेजासाठी रस्ता खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST

अंबाजोगाई- कळंब हा राज्य मार्ग पूर्वी युसूफ वडगावहून सुकळीमार्गे कळंबला जोडण्याचे नियोजन झाले होते. मात्र, मांजरा धरणाची निर्मिती झाल्याने ...

अंबाजोगाई- कळंब हा राज्य मार्ग पूर्वी युसूफ वडगावहून सुकळीमार्गे कळंबला जोडण्याचे नियोजन झाले होते. मात्र, मांजरा धरणाची निर्मिती झाल्याने सुकळी- गोटेगाव शिवारातून जाणारा हा रस्ता धरणाच्या पाण्याखाली जात असल्याने तो मार्ग बदलून युसूफ वडगावहून गोटेगाव- सुकळी असा रस्ता करण्यात आला. या ३ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी गोटेगाव व सुकळी येथील १८ शेतकऱ्यांची जवळपास ८ एकर २५ गुंठे (३३० गुंठे) जमीन संपादित करून रस्त्याचे काम पूर्ण केले होते. रस्त्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना आणखीही मावेजा मिळालेला नाही. जमिनीतून रस्ता गेला, मात्र आणखीही त्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावरच आहेत. मावेजा मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी एक महिन्याच्या कालावधीत या रस्त्याची कागदपत्रे काढून शासनाकडे सादर करू, असे लेखी आश्वासन केजच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विलास कांबळे यांनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने पुन्हा संबंधित शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी आता रस्त्यासाठी दिलेल्या जमिनीचा मावेजा द्या अथवा हा रस्ता शासनाच्या मालकीचा आहे. याचे पुरावे सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावेत या मागणीसाठी सोमवारी या रस्त्यावर कब्जा करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी सोमवारी या मार्गावरील सुकळी येथे उतरून जमीन मालकीची आणि मालकीच्या जमिनीतून जाणाऱ्या रस्त्यावर आमचा हक्क आहे, अशी भूमिका घेऊन रस्त्यावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुन्हा आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी रस्त्यावर खोदकाम सुरू केले. शेतकऱ्यांनी मागण्यावर ठाम राहत डांबरीकरण रस्त्याच्या बाजूचा कच्चा रस्ता खोदून घेत रस्त्यावर थांबून होते. तहसीलदार आणि सा.बां. उपविभागाच्या अभियंत्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने उपअभियंता विलास कांबळे हे ठाण्यात बसून होते.

शेवटी आंदोलक शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतानासुद्धा तहसीलदार मेंडके यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून या रोडची कागदपत्रे, शेतकऱ्यांना त्यावेळी मावेजा दिला का नाही, याची शहानिशा करू अगर मावेजा मिळालेला नसेल तर भूसंपदनाचा प्रस्ताव तयार करून मावेजा मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे वचन दिल्यानंतर रात्री ८:३० वाजता आंदोलक शेतकरी रोडवरून उठले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी युसूफ वडगाव पोलिसांच्या वतीने दिवसभर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.