शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई काही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईकाही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता. गेल्या पाच वर्षात डी. एड. होऊन गुरुजी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल पाहून या अभ्यासक्रमाला आता विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. बीड जिल्ह्यात २०५० डी.टी.एड. (डी.एड.) जागांपैकी केवळ ५१६ अर्ज प्राप्त झाले आहे. प्रवेशप्रक्रिया संपली तरी १५३४ जागा अजूनही रिक्त आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील जागांचा प्रश्न तर मोठा भेडसावणारा आहे. दहा वर्षांपूर्वी १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण मिळाले तरच शासकीय कोट्यातून विद्यार्थ्यांना डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत होता. कमी गुण असणारे विद्यार्थी लाखो रुपये मोजून व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवत होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी संस्थाचालकांचे उंबरठे झिजवूनही प्रवेश मिळवणे अवघड होते. मात्र, आता ही स्थिती उलटी झाली आहे. आता संस्था चालकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी पालकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अध्यापक विद्यालयांची वाढती संख्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे वाढली आहे.या वाढत्या खाजगी अध्यापक महाविद्यालयांमुळे डी.एड. चा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली अन् नौकरीची संधी कमी. याचा परिणाम म्हणून डी.एड.च्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. बीड जिल्ह्यात एकूण ३५ अध्यापक महाविद्यालय आहेत. यात दोन अध्यापक महाविद्यालय तर एक अनुदानित उर्वरित ३० अध्यापक महाविद्यालय विनाअनुदानित आहेत. बीड जिल्ह्यात डी.एड.च्या एकूण २०५० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे ७३१ अर्जांची विक्री झाली. या अर्जांपैकी केवळ ५१६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रवेशप्रक्रिया संपत आली तरी अजूनही १५३४ जागा बीड जिल्ह्यात रिकत आहेत. याशिवाय प्रत्येक विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयाचा व्यवस्थापन कोटाही शिल्लक असल्यामुळे अध्यापक महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थ्याविना अत्यंत दयनीय झाली आहे. शिक्षकांना धरू लागले वेठीसडी.एड. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळत नसल्याने या संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकांना संस्थाचालकांनी वेठीस धरले आहे. काहीही करा, कसेही करा, विद्यार्थी मात्र आणा अशा सक्त सूचना संस्था चालकांनी शिक्षकांना बजावल्या आहेत. त्यामुळे नोकरी आणि विद्यार्थी या दोन्हीच्या कात्रीत अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक सापडले आहेत. अनेक विद्यार्थी वळाले स्पर्धा परीक्षेकडेगेल्या तीन वर्षात सीईटीच झालेली नसल्याने डी. एड. केलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळले आहेत. शिक्षक म्हणून काम मिळाले तरी वेतन मिळणे दुरापास्त असल्याने व हातात डिग्री असूनही संस्थाचालकांना लाखो रुपयांचा अर्थपूर्ण व्यवहार करून नोकरी मिळवण्यापेक्षा हा अभ्यासक्रमच नको असा समज निर्माण झाला आहे.