शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई काही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईकाही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता. गेल्या पाच वर्षात डी. एड. होऊन गुरुजी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल पाहून या अभ्यासक्रमाला आता विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. बीड जिल्ह्यात २०५० डी.टी.एड. (डी.एड.) जागांपैकी केवळ ५१६ अर्ज प्राप्त झाले आहे. प्रवेशप्रक्रिया संपली तरी १५३४ जागा अजूनही रिक्त आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील जागांचा प्रश्न तर मोठा भेडसावणारा आहे. दहा वर्षांपूर्वी १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण मिळाले तरच शासकीय कोट्यातून विद्यार्थ्यांना डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत होता. कमी गुण असणारे विद्यार्थी लाखो रुपये मोजून व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवत होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी संस्थाचालकांचे उंबरठे झिजवूनही प्रवेश मिळवणे अवघड होते. मात्र, आता ही स्थिती उलटी झाली आहे. आता संस्था चालकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी पालकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अध्यापक विद्यालयांची वाढती संख्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे वाढली आहे.या वाढत्या खाजगी अध्यापक महाविद्यालयांमुळे डी.एड. चा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली अन् नौकरीची संधी कमी. याचा परिणाम म्हणून डी.एड.च्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. बीड जिल्ह्यात एकूण ३५ अध्यापक महाविद्यालय आहेत. यात दोन अध्यापक महाविद्यालय तर एक अनुदानित उर्वरित ३० अध्यापक महाविद्यालय विनाअनुदानित आहेत. बीड जिल्ह्यात डी.एड.च्या एकूण २०५० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे ७३१ अर्जांची विक्री झाली. या अर्जांपैकी केवळ ५१६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रवेशप्रक्रिया संपत आली तरी अजूनही १५३४ जागा बीड जिल्ह्यात रिकत आहेत. याशिवाय प्रत्येक विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयाचा व्यवस्थापन कोटाही शिल्लक असल्यामुळे अध्यापक महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थ्याविना अत्यंत दयनीय झाली आहे. शिक्षकांना धरू लागले वेठीसडी.एड. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळत नसल्याने या संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकांना संस्थाचालकांनी वेठीस धरले आहे. काहीही करा, कसेही करा, विद्यार्थी मात्र आणा अशा सक्त सूचना संस्था चालकांनी शिक्षकांना बजावल्या आहेत. त्यामुळे नोकरी आणि विद्यार्थी या दोन्हीच्या कात्रीत अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक सापडले आहेत. अनेक विद्यार्थी वळाले स्पर्धा परीक्षेकडेगेल्या तीन वर्षात सीईटीच झालेली नसल्याने डी. एड. केलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळले आहेत. शिक्षक म्हणून काम मिळाले तरी वेतन मिळणे दुरापास्त असल्याने व हातात डिग्री असूनही संस्थाचालकांना लाखो रुपयांचा अर्थपूर्ण व्यवहार करून नोकरी मिळवण्यापेक्षा हा अभ्यासक्रमच नको असा समज निर्माण झाला आहे.