शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई काही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईकाही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता. गेल्या पाच वर्षात डी. एड. होऊन गुरुजी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल पाहून या अभ्यासक्रमाला आता विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. बीड जिल्ह्यात २०५० डी.टी.एड. (डी.एड.) जागांपैकी केवळ ५१६ अर्ज प्राप्त झाले आहे. प्रवेशप्रक्रिया संपली तरी १५३४ जागा अजूनही रिक्त आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील जागांचा प्रश्न तर मोठा भेडसावणारा आहे. दहा वर्षांपूर्वी १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण मिळाले तरच शासकीय कोट्यातून विद्यार्थ्यांना डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत होता. कमी गुण असणारे विद्यार्थी लाखो रुपये मोजून व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवत होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी संस्थाचालकांचे उंबरठे झिजवूनही प्रवेश मिळवणे अवघड होते. मात्र, आता ही स्थिती उलटी झाली आहे. आता संस्था चालकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी पालकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अध्यापक विद्यालयांची वाढती संख्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे वाढली आहे.या वाढत्या खाजगी अध्यापक महाविद्यालयांमुळे डी.एड. चा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली अन् नौकरीची संधी कमी. याचा परिणाम म्हणून डी.एड.च्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. बीड जिल्ह्यात एकूण ३५ अध्यापक महाविद्यालय आहेत. यात दोन अध्यापक महाविद्यालय तर एक अनुदानित उर्वरित ३० अध्यापक महाविद्यालय विनाअनुदानित आहेत. बीड जिल्ह्यात डी.एड.च्या एकूण २०५० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे ७३१ अर्जांची विक्री झाली. या अर्जांपैकी केवळ ५१६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रवेशप्रक्रिया संपत आली तरी अजूनही १५३४ जागा बीड जिल्ह्यात रिकत आहेत. याशिवाय प्रत्येक विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयाचा व्यवस्थापन कोटाही शिल्लक असल्यामुळे अध्यापक महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थ्याविना अत्यंत दयनीय झाली आहे. शिक्षकांना धरू लागले वेठीसडी.एड. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळत नसल्याने या संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकांना संस्थाचालकांनी वेठीस धरले आहे. काहीही करा, कसेही करा, विद्यार्थी मात्र आणा अशा सक्त सूचना संस्था चालकांनी शिक्षकांना बजावल्या आहेत. त्यामुळे नोकरी आणि विद्यार्थी या दोन्हीच्या कात्रीत अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक सापडले आहेत. अनेक विद्यार्थी वळाले स्पर्धा परीक्षेकडेगेल्या तीन वर्षात सीईटीच झालेली नसल्याने डी. एड. केलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळले आहेत. शिक्षक म्हणून काम मिळाले तरी वेतन मिळणे दुरापास्त असल्याने व हातात डिग्री असूनही संस्थाचालकांना लाखो रुपयांचा अर्थपूर्ण व्यवहार करून नोकरी मिळवण्यापेक्षा हा अभ्यासक्रमच नको असा समज निर्माण झाला आहे.